PODCAST · religion
Sudhakar Chodankar
by Sudhakar Chodankar
देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.
-
144
आनंदतरंग –
तरंग आनंदाचे असतात, पण ते निर्माण होत असतात आनंदाच्या स्थितीतून. जसे सागराच्या लाटा या सागरातच निर्माण होतात आणि त्यातच विलीन होतात. सागराच्या सातत्याच्या भरलेपणाच्या स्थितितूनच या लाटा निर्माण होतात. अगदी असेच भक्ताचे होत असते. तरंग क्षणभंगुर असतात पण मूळ अस्तित्व हे मात्र कायमचे असते. तसेच भक्ताची आनदाची स्थिति मात्र कायमची असते. असे का व कसे घडते ते पाहू या एपिसोडमधून
-
143
हरीने डाव मांडीला हो –
अनुभवास येणारे समग्र अस्तित्व हे केवळ एकमेव श्रीहरीचेच लीला लाघव आहे. विश्वरूपाने श्रीहरीचाच खेळ चालूआहे हा भक्ताचा अनुभव आहे. म्हणूनच तो म्हणतो “ हरीने डाव मांडीला हो – या डावाचे नावची संसार, हरी त्यात करी नित्यची संचार “ असे हा भक्त का म्हणतो ? हे पाहू या एपिसोड मध्ये.
-
142
आनंदाचा ठेवा आम्हासीच ठावा-
देवाचा भक्त हा सदैव आनंदात असतो. आनंद ही स्थिति आहे भक्ताची. समुद्र जसा कायम भरलेला असतो तसा भक्त देखील आंतरिक देवप्रेमाने भरलेला असतो. हे भरलेपण भक्ताचा स्थायीभाव आहे. मोर नाचून आनंद घेतो या पेक्षा आंनंदातून नाचतो. भक्त काही करून आनंद घेतो असे नाही तर त्याची हरएक कृती उक्ती आंतरिक आनंदातून उद्भवते. असा हा भक्त नेमका कसा घडतो हे प्रकट होत आहे या एपिसोडमधून.
-
141
समर्पण- सहज,स्वाभाविक स्थिति
भगवंताच्या भक्ताची सहज स्वाभाविक स्थिति म्हणजे समर्पण. तसे अनेक जण एखादी कृती म्हणा यश म्हणा वा यशातून झालेली प्राप्ती कुणाला तरी समर्पित करत असतात परंतु भक्त मात्र देवाला सर्वस्वी समर्पितच असतो. भक्ताची केवळ कृती नाही तर त्याचे अस्तित्वच देवाला सातत्याने समर्पित असते. असा हा भक्त कसा असतो हे प्रकट होतेय या एपिसोडमधून.
-
140
एक रंग तुझा खेळे-
भक्त केवळ एकीएक भक्तीरंगातच रमत असतो. तसे रंग अनेक आहेत. इतर रंगांचा राग नाही की हव्यासही नाही. वास्तविक काचेच्या लोलकातून प्रकाशाचा किरण गेला की विविध रंगांची उधळण होते. सार्याच रंगांची उत्पत्ति, स्थिति अन विलय या किरणातच होत असते. ऊर्जा , स्त्रोत, चेतना एकच आहे. अगदी तसेच सार्या अस्तित्वाची उत्पत्ति, स्थिति अन विलय या एकमेव ईश्वरी अस्तित्वातच होत असते. भक्त याच अस्तित्वाचा होऊन रहातो म्हणून तो म्हणतो – एक रंग तुझा खेळे -
-
139
नारायणायेति समर्पयामि-
भक्त देवाला समर्पितच असतो. खरेतर समर्पिताला मी समर्पित आहे असे सांगताही येत नाही. तरंग पाण्यापासून वेगळा नसतोच. मी पाण्याला समर्पित आहे असे सांगणे संभवतच नाही. अनुभवास येणारे समग्र अस्तित्व देवाचेच रूप आहे. मी देखील याच अस्तित्वाचा आहे तर मग “ मी” हा शब्द येईलच कसा? शब्दांची समज या एकरूपतेचा अनुभव नाही देऊ शकत. पराकोटीच्या भक्तीतूनच या अनुभवाचे होता येते. असे प्रकट होत आहे या एपिसोडमधून
-
138
चिंतनाचे सुखे, तुका म्हणे, नेणे दु:खे-
चिंतनाच्या अवकाशात जेव्हा साधक स्वताला अनुभवतो तेव्हा दु:खाची तेवढी झळ त्याला लागत नाही. दुखाचा समूळ नाश होतो असे नाही मी म्हणत. पण दुखापासून काही प्रमाणात फारकत होते हे निश्चित. चित्त स्थिर असेल, तर दु:ख वेगळेपणाने पहाण्याची किमया साधकाला हळू हळू साधत जाते. देव प्रेमी रमे तो मी- ही खरी ओळख सिद्ध होत जाते भक्ताची. अन मी दु:खाचा नाही लागत हे भान येते साधकाला. असेच रुपांतरण होत रहाते भक्ताचे – हे प्रकट होत आहे या एपिसोड मधून
-
137
पाहू देवरुप छान –
देवळातल्या देवाला , मूर्तीतल्या देवाला पहाता येते. पाहून आनंदही होतो. हा भविकाचा अनुभव झाला. पण देवाला जर स्वताच्या हृदयात अनुभवायचे असेल तर त्याचे स्वरूप जाणावे लागेल. “ देवाचे स्वरूप जाणून, पाहू देवरुप ते छान” भक्ता कडून हे जाणणे घडते तेव्हा हा देव प्रसन्न होतो भक्ताला पाहून. असेच प्रकट होत आहे या एपिसोडमधून -
-
136
राघवी वस्ती किजे-
समर्थ रामदास स्वामी मनाला प्रार्थना करतात – “ मना सज्जना राघवी वस्ती किजे-“ प्रभुरामांच्या भक्तीतूनच राघवी वस्ती होऊ शकते. भगवंताच्या प्रेमापोटी, भक्तीपोटी घडणार्या स्मरण, मनन चिंतनातून, ध्यासातून भक्त राघवी वस्तीला पावतो. प्रभुराम रामनवमीला जन्मले. भक्त देखील रामांच्या नवविधा भक्तीने सर्वस्वी प्रभुरामांचा होऊन रहातो- या एपिसोडमधून हेच प्रकट होत आहे.
-
135
भक्ति आता, या घडीला, नंतर नाही –
भक्ति ही वर्तमानाची आहे. पूजा केली किवा उद्या करेन असे म्हणता येते, भक्तीच्या बाबतीत हे शक्य नाही. सातत्याची नाही ती भक्तिच नाही. भक्ति हा तत्कालिक भाव नाही तर स्वभाव आहे, भक्ति कृती नाही तर वृत्ती आहे. कसे ते पहा या एपिसोड मधून -
-
134
नको डोळे भरून पाहुस सावळ्या हरीला –
अगं राधे, तू डोळे भरून पाहतेस या सावळ्या हरीला तर मग, काजळ लावायला डोळ्यात जागाच उरणार नाही ! अशी चिंता राधेच्या सखीला पडली. पण राधा सखीच्या या प्रश्नाला बेमालूम आंतरिक भक्तीच्या भरलेपणातून असे काही उत्तर देते की आपण चकित व्हाल – तेच ऐकू या एपिसोड मधून
-
133
देव रोकडा संत सज्जनी-
भाविकाला मूर्तितला, तसबीरीतला देव पुरेसा होत असेल, पण भक्ताला मात्र देव प्रत्यक्षाचा लागतो. त्याच्या सारखा हाडा मासाचा. तसबीर, फोटो पाहून निवड करता येते. पण लग्न व्हायचे असेल तर तसबीर नाही पुरेशी. प्रत्यक्ष व्यक्ति हवी. तसा देवही रोकडा हवा. असा हा रोकडा देव केवळ अन केवळ संत सत्पुरुषांच्या रूपानेच आपलासा होतो. जिथे भक्त पूर्णत्वाला पोचतो. असेच काहीसे प्रकट होत आहे या एपिसोडमधून
-
132
भेट अधूरी राही तरीही-
मित्रांनो, भक्त प्रकट करतोय आपली व्यथा. देवा, तुझी भेट कितीही झाली तरी अपुरीच पडते मला. खरे तर प्रेमात आगतिक झालेल्या आपल्या प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. भक्त काही अपवाद नाही. परंतु या व्यथेवर देव भक्ताला जे सांगतो ते विलक्षण आहे. ते देवाचे सांगणे (वचन) जेव्हा भक्ताचे जीवन होते तेव्हा अखंड मिलनाचा अनुभव भक्त घेत असतो. तो कसा तेच पाहू , या एपिसोड मधून
-
131
मन मंदीरा तेजाने -
मनाला मंदिर म्हटले आहे. आपण मंदिर कशाला म्हणतो ? ज्या वास्तूत देवाची प्रतिष्ठापना झाली आहे त्याला. माझ्या मनात देवाची अशी स्थापना झाली आहे का ? तरच मनाला मंदिर म्हणता येईल ना? केवळ स्थापना होणे पुरेसे नाही तर तसे पावित्र्य, तशी सजावट , तशी नित्याची साधना घडते आहे का ? अशाच प्रश्नाचा शोध घेत आहे साधक या एपिसोड मधून-
-
130
नमिला गणपति
श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग म्हणताना माझ्या कडून नमन घडत असते. पण म्हणून झाल्यावर मनात सारखी खंत येत रहाते. “ नमिला गणपति” म्हणतो मी पण गणपति अजून मिळालाच नाही असे वाटत असते. गणपति अजून लाभलाच नाही मला. असे का होते हेच प्रकट होत आहे या एपिसोड मधून -
-
129
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान-
भाविक आणि भक्त यात फरक आहे. भाविक भक्त होईलच असे सांगता येत नाही. तशी संभावना असते. भक्ताचा प्रवास म्हणजे साधकत्व. साधक होणे म्हणजे प्रयोगशील होणे. सद्गुरुवचन जीवनात उतरविण्यासाठी प्रयत्न हाच प्रयोग. यातूनच देव भेटीचा योग घडतो. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान – हे भक्ताचे उद्गार – त्याच्या आंतरिक स्थितीची चाहूल देतात. ही दत्ताची आरती , केवळ शाब्दिक , वा भावनिक त्यावेळेपूर्ती आर्तता नाही तर साधकाचे समग्र जीवन कवेत घेणारी स्थिति आहे असेच प्रगट होत आहे या एपिसोड मधून ..
-
128
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल-
श्री संत तुकाराम महाराज सांगत आहेत. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. मला तर जाणवते आहे की साक्षात विठ्ठलच बोलतोय श्री संत तुकाराम महाराजांच्या मुखातून. असे काय बोलतोय तेच ऐकू या एपिसोडमधून “बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव”
-
127
आवडे निरंतर हेचि ध्यान-
श्री संत तुकाराम महाराज अगदी आनंदाने सांगत आहेत. आवडे निरंतर हेचि ध्यान. ही त्यांची आवड काही क्षणाची , वेळेची नाही. माझीही आवड निवड असते. पण आजची आवड उद्या नावड होऊ शकते माझी. इथे तर संत तुकाराम महाराज आवडी निवडीच्या पलीकडे पोचले आहेत. आवडे निरंतर असे म्हणत आहेत ते. आता हे ध्यान कुणाचे ? केवळ मूर्तीचे ?की जिला पहाता पहाता ते अंतरंगातून अखंड ध्यानमग्न झाले. या ध्यानाबद्दल बोलत आहेत की काय ? हेच ऐकू या एपिसोड मधून .
-
126
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे-
सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच भक्ताला येतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे- सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच घडू शकतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून. सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच घडू शकतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून.
-
125
मेरे जिंदगीमें हुजूर आप आये
भगवंत जेव्हा भक्ताच्या अनुभवाचा होतो तेव्हा भक्त कृतार्थ होत असतो. या कृतार्थतेतूनच भक्त नितांत कृतज्ञ रहातो देवाचा. कारण आता देव हा भक्ताच्या जीवनात संचारून असतो. या अशा आंनंदातून तो गातो " बहुत शुक्रिया बडी मेहरबानी , मेरे जिंदगीमे हुजूर आप आये. सर्वांगाने भक्ताचे प्रिय करतो तोच खरा प्रियकर अन भक्त त्याची प्रेयसी - ती गाते या एपिसोडमधून -
-
124
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो –
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो – संत ज्ञानेश्वर माऊली समग्र विश्वासाठी पसायदान मागते . आत्यंतिक कारुण्याने.“विश्व स्वधर्म सुर्ये पाहो “ हे मागणे का आहे तर दुरितांचे तिमिर म्हणजे त्यांचा अज्ञान रूपी अंध:कार नाहीसा होवो. पण अंधार आहे की नाही हे डोळे उघडल्याशिवाय कसे कळणार? आता माऊली माझे डोळे कसे उघडणार? मलाच हे करावे लागेल. हेच प्रकट होत आहे या एपिसोडमधून -
-
123
अब हरी है, मै नाहि-
अब हरी है, मै नाहि- परमेश्वराचे महान भक्त संत कबीर म्हणतात “अब हरी है, मै नाहि “ संत कबीर जे स्वताला “मी नाही” म्हणतात. जर मीच नाही तर “ अब हरी है मै नाही” हे ते कसे म्हणू शकतात? माझा आत्मविश्वास आहे की संत कबीर जे सांगत आहेत ते अंतिम सत्य आहे. तेच आता ऐकू या या एपिसोड मधून.
-
122
शब्देविण संवादु दुजेविण अनुवादू-
शब्दांशिवाय संवाद – दूसरा असल्याशिवाय अनुवाद शक्य आहे का ? पण संत ज्ञानेश्वर माऊली अशक्य ते शक्य करून दाखवते केवळ स्वानुभवाने. शब्द देखील प्रतिमा आहेत. त्या प्रत्यक्षापर्यंत नाही नेऊन ठेवत. आरशातील प्रतिमा जशी दुसरी असते तसेच शब्दांचे आहे. रूप, रस, गंध, स्पर्ष आणि नाद ज्या एकत्वातून उद्भवतात पुन्हा त्याच एकत्वात विलीन होतात या जाणिवेकडे माऊली निर्देश करताना मी त्या ध्यासाचा होऊन राहतो. असेच प्रकट होत आहे या एपिसोड मधून
-
121
ठेविले अनंते तैसेची रहावे
ठेविले अनंते तैसेची रहावे – वास्तविक ज्याने मला ठेवले आहे तो अनंत कोण ? हा जो मला ठेवणारा अनंत, तो मुळात कसा आहे ? त्याला मी कसे रहावे हे आभिप्रेत आहे? हे सारे प्रश्न भविकाला पडत नसतील पण भक्ताला मात्र पडतात हे खरे? किंबहुना ज्याला पडतात तोच भाविक भक्त होण्याची शक्यता असते. भक्ताचे प्रश्न केवळ कुतुहल वा जिज्ञासा एवढ्या पुरते नसतात. भक्ताचे प्रश्न पडत नाहीत तर कायमचे समोर उभे रहातात ठामपणे अन भक्ताला भक्तीच्या दिशेनं पुढे नेत असतात ध्यासापोटी. हा ध्यास प्रकट होत आहे या एपिसोडमधून
-
120
जेणे बोले विठ्ठल डोले -
जेणे बोले विठ्ठल डोले - संतांचे सहज बोलणे हा त्यांच्या अलौकिक आंतरिक आनंदाचा सहज उत्सव असतो. किंबहुना त्यांच्या रूपाने भगवंतच साकार होत असतो. “ बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले” या संत नामदेव महाराजांच्या शब्दातून मला जाणवतेय की प्रत्यक्ष पांडुरंगच डोलतोय त्यांच्या रूपाने. चला तर आपणही काहीसा फील घेऊ या आनंदाचा -
-
119
देवाच्या या आनंदाचे -
देवाच्या या आनंदाचे – सर्वसाधारपणे आपण सारेच, काहीतरी करून आनंद घेत असतो . कुणी आवडीचे पहातो, कुणी खातो कुणी ऐकतो, कुणी स्पर्श करून तर कुणी गंध घेऊन आनंद अनुभवत असतो. म्हणजेच आनंदासाठी कृती आवश्यक आहे. पण माझ्या सद्गुरूना न्याहाळतांना एक शोध लागला की त्यांची हरेक कृती आंतरिक आनंदातून उद्भवत आहे. आनंद ही त्यांची कायम स्थिति आहे. या सहज स्थितीतून त्यांची कृती घडत आहे. काही करून ते आनंद घेत आहेत असे नाही त्यांच्या बाबतीत. आज काहीसा असाच फील येतोय मला. तोच प्रकट होत आहे या एपिसोड मधून.
-
118
कृष्ण मज ना वेगळे पाही
कृष्ण मज ना वेगळे पाही – कृष्ण भक्त राधेचे हे बोल आहेत. असे का बरे बोलते राधा? एवढेच नाही तर ती पुढे स्पष्टपणे , ठामपणे सांगते – मी मग त्याची होऊनि राही – कृष्णाचा शोध घेता घेता राधा कृष्णस्वरूप हौऊनि राहिली. कशी ? तेच ऐकू या एपिसोड मधून.
-
117
आकळावा श्रीपति येणे पंथे
आकळावा श्रीपती येणे पंथे - जर हा भगवंत अनुभवाचा व्हायचा असेल तर संतांचा संग आवश्यक आहे , सद्गुरू सहवास आवश्यक आहे. पण या सहवासातून मनास भगवंताचा ध्यास नाही लागला तर मनोमार्ग सुरूच होत नाही. मनाला गती मिळणे पुढची गोष्ट आहे. देव स्वानुभवाचा होणे यालाच आकळावा श्रीपती म्हणतात. आता हा मनोमार्ग कसा घडतो काही कथन घडत आहे या एपिसोड मधून
-
116
निवृत्ती तिष्ठतु एकरूप चित्ति
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्ति- एके दिवशी नारदमहर्षि आत्यंतिक प्रेमाने नारायणाला विचारतात “ हे भगवंता, आपण कुठे रहाता ?“ तेव्हा भगवंत चटकन उत्तरतात “ अहो नारद महर्षि, जिथे माझेभक्त गायन करतात तिथे मी असतो”. मला प्रश्न पडतो जर भगवान नारायणाने मलाच प्रश्न विचारला“आता मला सांग, तू कुठे रहातोस?” मी सहजसांगेन मी तुझ्यातच असतो भगवंता “म्हणजे नेमके कुठे म्हणाल तर निवृत्ति नाथांचे शब्दओठावर येतील “ निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्ती-“ चला ऐकू, भक्ताचे वास्तव्य नेमके कुठे असते ते --
-
115
तू अंतरी संचारणारा
तू अंतरी तू संचारणारा – परमेश्वर सगळीकडे संचारलेला आहे एवढे ऐकून, वाचून, बोलून माझे समाधान नाही होत. त्याचाच साकळीकडे संचार आहे पण मला काय त्याचा उपयोग? माझ्यात तोच संचारून आहे ही जोपर्यंत माझी Reality होत नाही तो पर्यन्त ही केवळ पोपटपंची जाणवते मला. अंगात देव देवी येत असेल कुणाच्या. माझा अनुभव नाही तो . देव अंगात येण्यापेक्षा अंतरंगात का अनुभवास येत नाही हा माझा ध्यास आहे. असेच प्रकट होत आहे या एपिसोडमधून
-
114
आनंदची अंग आनंदाचे-
आनंदची अंग आनंदाचे-पांडुरंगाचे परमभक्त श्री संत तुकाराम महाराजांकडुन त्यांच्या अंत:करणात उद्भवणारा अलौकिक आनंदाचा सहज सुंदर उत्सव म्हणा कल्लोळ म्हणा शब्दातून काहीशा अंशाने प्रकट होत आहे. आनंद हे आनंदाचेच अंग आहे. पूर्णातून पूर्णच उद्भवणार अन पुन्हा पूर्णातच एकरूप होणार असे काहीसे म्हणत असावेत - पाहूया आता .
-
113
देव आनंदात पाहू -
देव आनंदात पाहू - देव दर्शन हे एकांगी असते, पण देव भेटी उभयतांची असते. देव भेटीत केवळ दर्शन नसून मार्गदर्शनही असते. जिथे भक्त किवा शिष्याचा आत्मशोधाचा मार्ग सुरूहोतो अन यालाच भक्ति म्हणतात. असा भक्त देवाला प्रत्यक्ष आनंदात पहातो. देव देवळात मंदिरात तीर्थक्षेत्री पहाता येतो. पण भक्तासाठी देव केवळ हृदयाचाच असतो. तेव्हा भक्त पाहू काय म्हणतो ते - देव आनंदात पाहू
-
112
मना संत आनंत शोधुनी पाहे
मना संत आनंत शोधुनी पाहे - संतांना शोधायचे म्हणजे त्यांच्या अंतरंगाचा शोध घ्यायचा. तरच आपल्याच स्वताच्या अंतरंगात डोकावणे घडू शकते. आत्मशोध म्हणतात स्वताचा शोध तो हाच. संत जसे ईश्वरी अनुभवाने सदा आनंदी, समाधानी, शांतिपूर्ण असतात तसे आपण होणे हेच तर जीवनाचे प्रयोजन. तेव्हा साधकाचा हा शोध कसा होतो तेच प्रकट झाले आहे या एपिसोडमधून
-
111
तेथेच स्फुरते रामायण
रामनवमीला अनेकांचे शुभ संदेश आले. अनेकजण जोडून आहेत याचा आनंद होतो आणि या सार्यांचा मी खूप ऋणि आहे या जाणिवेने मी सर्वांचे देणे लागतो असेच वाटते मला. केवळ ईश्वरी प्रेम देणे आणि घेणे यासारखे आनंददायी दुसरे काहीच नाही. " तेथेच स्फुरते रामायण " या एपिसोडमधून हे प्रेमच प्रकट होत आहे.
-
110
देव माझा मी देवाचा
देवाचे सारेच आहे. किंबहुना देवच साकार झालाय समग्र अस्तित्वाने. पण या अनुभवाचा मी झालो का? देव माझा झाला का आणि मी एकीएक देवाचाच झालो का या ध्यासाने जेव्हा भक्त सक्रिय होतो तेव्हा तो म्हणतो " देव माझा मी देवाचा " - तेव्हा ऐकू भक्त काय म्हणतो ते -
-
109
आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे
आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे- असे भक्त म्हणतोय. आंतरीक कृतार्थतेतून उद्भवणारी त्याची कृतज्ञता सहजतेने वहात आहे त्याच्या सद्गुरूंच्या , पर्यायाने त्याच्या भगवंताच्या चरणापाशी. आनंदाचे जीवन झाले झाले तुझ्यामुळे - या आनंदाचे मूळ आहे कुठे , फळ आहे कुठे हे प्रकट होतेय त्याच्या ओघवत्या मधाळ वाणीतून- तीच ऐकू आता -
-
108
परी देव शोधोनी कोणी न पाहे
श्री समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात- मनी मानिला देव तो पुजीताहे , परी देव शोधोनी कोणी न पाहे - ते का बरे असे सांगतात ?खरे तर ते साधकाला, भक्ताला, शिष्याला सावध करीत आहेत असेच जाणवते मला. असेच काहीसे प्रकट होत आहे "देव शोधोनी कोणी न पाहे " या एपिसोड मधून -
-
107
आलासी देवा जीवनी
आलासी देवा जीवनी- देव आधी जीवनात यायला हवा तरच आंतरिक बदल शक्य होतो. तरच जीवन आनंदाचे होते. भक्तीचे समृद्धीचे होते. मी देवळातला देव म्हणत नाही, जे दैवत सद्गुरूरूपाने भक्ताच्या जीवनात प्रत्यक्ष येते. विलक्षण सहवासातून हा प्रत्यक्ष देव जेव्हा अप्रत्यक्ष होतो तेव्हा भक्ताच्या ठिकाणी हेच दैवत प्रस्फुटित होत रहाते हीच तर यथार्थ भक्तीची किमया. असेच प्रकट होत आहे " आलासी देवा जिवनी, जगता गोडी कळे " या एपिसोड मधून.
-
106
देवा सोबत की देवा संगे ?
देवा सोबत असणे तसे बाह्यांगाचे असते. पण संगे असणे हे बाह्यांगाबरोबर अंतरंगाचेही असते.
-
105
तुला पाहतांना
देवाला भक्त सदैव पाहत असतो. भक्ताचे पहाणे केवळ डोळ्यांचे नसते. केवळ संवेदनांचे नसते, अंतरंगाचे असते. जिथे यथार्थ दृष्टीचा उद्भव होतो. म्हणूनच भक्त गातो "तुला पाहताना, तुझे गीत गातो, तुझे गीत गाता, तुझाची मी होतो" "देवाचा होणे" हीच तर साधकाची आंतरिक प्रक्रिया आहे. भक्ताचे रूपांतरण म्हणतात ते हे. भक्ताला सत् स्वरुपा कडे नेता नेता त्यातच विलीन होते ते संतत्व....असेच काहीसे प्रकट होत आहे या एपिसोड द्वारे ....
-
104
हरीसी करुणा येईल तूझी
भगवंत हा करुणेचा सागरच आहे. जसा सागर जलमय असतोच तसा भगवंत करुणामय आहेच. प्रश्न एकच आहे. माझी मला करुणा येते का? माझीच मला कीव येते का? मी दुःखी कष्टी होतो का? माझी मनस्थिती केविलवाणी होते का? आणि होत असेल तर यावर उपाय काय? याचा शोध घेताना हे ' मी ' आणि 'माझे' म्हणून जे मानले जाते त्याचा सुगावा लागत राहतो. इथेच भक्तीची आर्तता निर्माण होते. या अनुभवातूनच दुःखाचे निरसन होते तेव्हा भक्त म्हणतो "हरिसी करुणा येईल तुझी "
-
103
येवूनी पावलो मूळस्थानी
मूळस्थानी पावणे म्हणजे काय हो ? ऋषींचे कूळ अन् नदीचे मूळ विचारू नये म्हणतात, पण भक्त तोच जो मूळ शोधतो. त्याशिवाय शांति समाधान आनंद नाही. हे मूळ बाहेर नाही ते आतच आहे. जिथे भगवंताचा निवास आहे.असा हा एकांतिक झालेला भक्तच या मूळ स्वरूपाला पावतो. हरीचे हे कूळ पवित्र पावन, भक्त हे भूषण या कुळीचे .......असेच प्रकट होत आहे या एपिसोड मधून
-
102
देवाकडे गेलो माझ्या घरी आलो
देवाकडे गेलो माझ्या घरी आलो.. देवाला शोधायला निघालो , शोध लागताच जाणवले की अरे, मी माझ्याच घरी पावलो, या आधी मी केवळ भरकटतच होतो, आता निवांत झालो, शांत समाधानास पावलो. का ? तर माझ्या घरी पावलो म्हणून. हे घर बाहेर नाही इथे आतच आहे. हेच सांगतोय भक्त. केवळ सद्गुरू कृपा दुसरे काय ?
-
101
मी तू पणाची आनंद उर्मि
मी तू पणाची आनंद उर्मि- भक्ताच्या ठिकाणी सातत्याने भक्तीपोटी मी तू पणाची उर्मि निर्माण होत असते. हा मी म्हणजे भक्त अन तू म्हणजे देव. यातूनच मिलनाचा अन विरहाचा खेळ भक्ताच्या हृदयात घडत असतो. दैनंदिन जीवनात तसे मी मी, तू तू चे प्रसंग अधून मधून येत असतात. त्यातून वाद, विवाद , भांडणे होतात देखील. क्वचित वेळा झोंबाझोंबीही होते. त्यातून अबोला, दुरावा होतोही. या काही आनंदाच्या उर्मि नसतात. ही दुर्दैवी मानसिकता असते. तिचा शोध घेतला जात नाही. असा प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून पुरेसे प्रयत्नही नाही घडत. भक्तीपोटी स्वचा शोध घेताना भक्त सर्वांच्या प्रेमाचा, आपुलकीचा होत रहातो. मानसिक दुर्बलतेतून उद्भवते ती गर्मी / गुर्मी पण भक्तीची सबलता मात्र भक्ताच्या हृदयात सदा आनंदाची उर्मि निर्माण करत असते.
-
100
काही नाहीतच सर्व काही
काही नाहीतच सर्व काही - सद्गुरूंशी प्रत्यक्ष भेटीची खरी सार्थकता जर कशात असेल तर "मी सदैव त्यांच्या भेटीतच आहे " या जाणिवेत. देवाचाच होऊन रहाणे घडते आता. याच आनंदात जीवन हलके फुलके जाणवते. सद्गुरूंच्या सहवासातील घडलेले श्रवण नव्याने माझ्यातून उगवून येत असते सातत्याने. काही महिन्यापूर्वी जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली होती तेव्हा ते म्हणाले “ अरे सुधाकर, काही नाहीतुनच सर्व काही उद्भवते अन सर्वकाही पुन्हा काहीनाहीतच विलय पावते” माझ्यासाठी त्यांचे हे उद्गार सातत्याने स्पार्क निर्माण करत आहेत. ते नेमके काय आहेत ते पाहू “काही नाहीतच सर्वकाही “ या एपिसोडमधून.
-
99
ही इज EVERYWHERE
डॉक्टर ICU च्या बाहेर लगबगीने येतात अन् नातेवाइकांना दबलेल्या शब्दांनी सांगतात " He is no more" ऐकताच सारेच गर्भगळीत होतात, प्रचंड दुःखी होतात. "He is no More" हेच डॉक्टरांचे शब्द जेव्हा माझ्या सद्गुरूंनी , त्यांच्या सद्गुरूंच्या निर्याणाच्या घडीला ऐकले तेव्हा माझे सद्गुरू सहज उद्गारले " Impossible , He is every where , and that Every where is here in my Heart " सद्गुरुंचे हे सहज उद्गार माझ्यासाठी महावाक्य होऊन राहिले... या उर्मितूनच हा एपिसोड प्रकट होत आहे.
-
98
शांत हरी हास्य करी
हरीचे स्मितहास्य प्रगाढ शांतीतून उद्भवते. हरी हा शांत स्वरूप आहे म्हणूनच या शांतितून उद्भवणारे भगवंताचे स्मितहास्य भक्ताला मोहित करते. हा नारायण भुजगशयनं असला तरी स्मितहास्य काही मावळत नाही या हरीचे. काय बरे हे भगवंताचे सहज सुंदर अस्तित्व? हा कोणता सहज योग भगवंताचा? भक्त, ऋषि, मुनी, योगी, ध्यानी या साऱ्यांची एकच तहान, एकच वेड, केवळ देवाचे अद्भुत अलौकिक रूप पहाण्याचे. . माझे देखील वेडेपण या एपिसोड मधून प्रकट झालेय मित्रांनो!
-
97
जाणिवेच्या उगमापाशी
भक्ति तिच जी जगण्याला भान देते. जिवंत सगळेच असतात पण यथार्थाने आनंदाने जगणे घडते का ? हा प्रश्न केवळ भक्तीतूनच उद्भवतो अन जीवन भक्तीचे होता होता भक्त आनंदाचा स्वामी होऊन रहातो. “मी “ म्हणून हा जो कोणी आहे तो मनाचा, शरीराचा बांधील असतो म्हणूनच जगणे आनंदाचे होत नाही. भक्ति याच “मी” ला स्वत्व देते. स्व च्या शोधासाठी ध्यास लावते. तेव्हाच मन, मनाची बुद्धी, विचार, विकार, कल्पना, स्मृति, संस्कार, मान्यता, समजुती आणि या सर्वातून घडणारा आपला स्वभाव अगदी स्पष्ट दिसायला लागतो भक्ताला. तेव्हा कळते, अरे हा जो माझा स्वभाव, जो मी पहातोय तो वेगळा अन मी पहाणारा वेगळा. याचे भान येत जाते. हे भानच जेव्हा सहज अन सतत असते तेव्हाच ती जाणीव होऊन रहाते भक्ताची. आपल्या या मूळ स्व ( स्वरूपाचे ) होत रहातो तो. हेच ते “जाणीवेच्या उगमाकडे”
-
96
जगू आनंदे,निघू आनंदे, संगे आनंदे वैकुंठा
जगू आनंदे,निघू आनंदे, संगे आनंदे वैकुंठा. कोणत्यातरी मराठी चित्रपटातील हे गाणे. मी काही चित्रपट पाहिला नाही. परंतु या गाण्याच्या ओळी माझ्या जगण्याला जणू आशय देत आहेत असे सखोलतेने जाणवते मला. किंबहुना जीवनात आनंद सापडेल की नाही माहीत नाही पण आनंदात जीवन सापडते हे निश्चित. हाच आशय या एपिसोड मधून प्रकट होत आहे.
-
95
माझ्यातून जग अन जगातून मी
जगातून मी गेलो की मृत्यू, अन् माझ्यातून जग गेलं की मुक्ती. पण मी या जगातच आहे. माझ्यातून जग गेले की मी ही जाणारच. जो पर्यंत मी आहे तोपर्यंत जग असणार. संत कबीर म्हणतात जब मैं था तो हरी नाही अब हरी है मैं नाही. सद्गुरुंचे हे वचन जसजसे भक्ताच्या अंतरात रुजत राहते तसा मी विरहित भक्त उगवत राहतो. तसा भक्त या बोधाचा होत असतो. सद्गुरुंचे वचन आता भक्ताचे beingness होत रहाते. असेच काहीसे भक्ताच्या अनुभवातून प्रकट होत आहे या एपिसोड मधून.
We're indexing this podcast's transcripts for the first time — this can take a minute or two. We'll show results as soon as they're ready.
No matches for "" in this podcast's transcripts.
No topics indexed yet for this podcast.
Loading reviews...
ABOUT THIS SHOW
देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.
HOSTED BY
Sudhakar Chodankar
CATEGORIES
Loading similar podcasts...