PODCAST · religion
Guru Shishya Sukhsamwad
by Saurabh Kapoor
Parampriya Parmanand Swami Maharaj unraveling the beautiful truth of life via conversation with his disciple. This is the modern-day Bhagvat Gita, Pramanand Prabhuji guiding his disciples just the way Shri Krishna guided Arjun.
-
498
Episode 506 as on 12th May 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 12th May 2026सुप्रभात, सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति . एक प्रभूंना नमस्कार केला की सर्व देवांना नमस्कार पोहचतो कारण सर्व देवांचे गुणधर्म प्रभूंमध्ये सामावलेले आहेत . त्यांच्याठायी शंकराचे वैराग्य, गणपतीची बुध्दी, बुधाचे चातुर्य, दत्तप्रभूंची आर्तता, देवीचे मांगल्य, हनुमंताची भक्ती व रवीचे तेज एकवटलेले आहे. म्हणूनच आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् एक देव पूजन व भजनासाठी जीवन अवघे उरले. जय परमानंद 🙏🙏🙏सुप्रभात, ईश्वराची भक्ती म्हणजे राग , सूर , स्वर , ताल व शब्द यांना गुंफून बंदिस्त नव्हे तर मुक्त केलेले स्थिर व मधुर आत्मगायन आहे. पांडुरंगाने असेच गायन करून संतसत्पुरुषांचा व परिणामी जनसामान्यांचा मेळा जमविला . दत्तप्रभूंच्या कार्यात प्रभूसुध्दा ही बंदिशी सुखानंदसंवाद व अन्य माध्यमातून अविरतपणे गात आहेत. त्यांची बंदिशी हीच माझी बंदिशी. तीच बंदिशी जमेल तशी गायचा माझा प्रयत्न आहे .वेडे वाकुडे गाईन । परी तुझाचि म्हणवीन। जय परमानंद 🙏🙏🙏
-
497
Episode 505 as on 8th May 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 8th May 2026सुप्रभात, अर्जुनाचे आणि कृष्णाचे मैत्रीचे नाते होते. कृष्णाने अर्जुनाशी सख्यत्वाचे नाते जपले होते व ऐक्यत्वासाठी आतुर होता. सख्यत्वातून ऐक्यभावापर्यंत जाण्यासाठी दास्यत्व ( समर्पणभाव ) हे माध्यम आहे. 'माम् एकम् शरणम व्रज' असे कृष्णाने सांगूनही पाहिले. पण ना अर्जुनाने हे वचन गंभीरपणे घेतले ना कृष्णाने तसा आग्रह धरला. परिणामी अर्जुनाच्या जीवभावाने कृष्णभावावर मात केली व अर्जुन आत्मनिवेदनापासून वंचितच राहिला. जय परमानंद 🙏🙏🙏सुप्रभात, देवळातला देव विचारपूस करत नाही. प्रदक्षिणा घातल्याने तो प्रसन्न झालाय किंवा कसे हे कळत नाही. प्रभूंना प्रदक्षिणा नकोत तर मनाची मोकळीक हवी. प्रभू विचारपूस करतात, प्रत्यक्ष संवाद होतो म्हणून विचारचक्र सुरू होते. हे सद्विचारचक्र जेव्हा मनात प्रवेश करते तेव्हा मनातील विकार दूर होतात व चिंतन व मनन सुरू होते. या चिंतनातूनच आपली विचारपूस करणाराच मानवदेहधारी ईश्वर आहे हा भाव दृढ होतो व भक्ती घडायला लागते . जय परमानंद 🙏🙏🙏
-
496
Episode 504 as on 5th May 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 5th May 2026सुप्रभात, सकाळी जाग देहाला आली मन झोपलेच नव्हते. देह व देहात मन आहे म्हणून देहभाव आहे आणि देहभाव हे वरदान आहे. कारण देहभावामुळेच सगुण प्रभूंबरोबर खेळ खेळून भावपूर्ण अवस्थेचा अनुभव घेता येणे शक्य आहे. म्हणून आनंद आहे. देहातीत अवस्था म्हणजे इतिश्री , विलय . त्या अनुभवाचे वर्णन कसे करता येईल? म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जय परमानंद 🙏🙏🙏सुप्रभात, प्रपंचात जीवाला जीव लावणाऱ्याचे कवतुक आहे आणि ते योग्यच आहे. पण प्रभू सुरुवातीला अफाट आणि अकारण प्रेमाच्या माध्यमातून जीवाला शिवभावाची जोड देतात व नंतर जीवभाव शिवभावात विलीन करण्यासाठी उद्युक्त करतात , तशी कोशिश करतात. हा खरा तर जीवघेणा खेळ पण तो हवाहवासा वाटतो व आनंददायीही असतो. हीच तर या खेळाची गंमत आहे. जय परमानंद 🙏🙏🙏
-
495
Episode 503 as on 1st May 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 1st May 2026सुप्रभात, प्रभूंचे प्रगटीकरण ,मग ते ग्रंथ असोत , पदे असोत, निरूपण असो , वचने असोत , किंवा सुखानंदसंवाद असो ,एक माया आहे असे प्रभू म्हणतात . पण ही माया मिथ्या कशी मानावी? कारण या प्रेमरुपातूनच , पक्षी सगुणातूनच , प्रभूंचे अंतःकरण , जे सत्य आहे त्याचा, ध्यास लागत आहे. जय परमानंद 🙏🙏🙏
-
494
Episode 502 as on 28th April 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 28th April 2026सुप्रभात, प्रदक्षिणा खूप झाल्या , संपवल्या आणि पांडुरंगाच्या गाभार्यात प्रवेश केला. तिथे कुणी नाही तिसरा. जर बाहेर पडायची वेळ आलीच तर विठोबाला घेऊनच बाहेर पडायच. माझा देव माझ्यापाशी. नित्य भेटतो मजसी. जय परमानंद 🙏🙏🙏सुप्रभात, नामदेव कीर्तनात दंग आहे आणि पांडुरंग गाभाऱ्यात वाट बघत उभा आहे. भेटीसाठी आतुर आहे. आर्तता देवाच्या ठायीच आहे. म्हणून तर भक्ताच्या प्रतीक्षेत देव दत्तपीठात कटीवर हात ठेवून उभा आहे. भक्त कीर्तनात दंग आहे पण गाभाऱ्यात येत नाही म्हणून देवच गाभाऱ्याबाहेर येतो . जनाबाई म्हणते 'नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ' जय परमानंद 🙏🙏🙏
-
493
Episode 501 as on 24th April 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 24th April 2026
-
492
Episode 500 as on 21st April 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 21st April 2026भक्त देवप्रेम घेतो। देवासी ते सर्व अर्पितो । देवाचा आनंद पाहूनी परमानंद घेतो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥ सत्संगतीतील संगीत. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेला शनिवारचा कार्यक्रम म्हणजे सुश्राव्य संगीताची अनोखी मैफील होती. सर्व उपस्थित प्रेमीजनांशी जवळीक साधून स्थानापन्न झाल्यापासूनच प्रभूंच्या अंतरंगातील सूर घुमू लागले होते. मन आत्मरंगी रंगीले , रामरंगी रंगीले . प्रभूंचे आत्मगायन जणू सप्तसुरांची लोभसवाणी बंदिश होती. कार्यक्रम रंगत चालला होता आणि तशातच प्रभूंनी सत्यविजय रेवाळेंना पदगायन करायला सांगितले. 'देवकार्य घडे प्रेमाने । देवप्रेम वाढे ( वाहे ) वेगाने ।'गोड व सुमधूर चालीतील या पदगायनाने प्रभू प्रसन्न झाले व प्रेमीजन आनंदित . त्याच भारावलेल्या वातावरणात प्रभूंनी माईक विदुलापुढे सरकवला आणि भावपूर्ण गायकीचा एक आगळावेगळा आविष्कार प्रकट झाला. ''जसा भाव ज्याचा तसा देव त्याचा'विदुलाच्या भावाच्या प्रभूंचे दर्शन प्रेमीजनांना झाले. प्रभूंचा प्रतिसाद केवळ कौतुकाचा नव्हता तर ज्या भावातून व अनुभवातून प्रभूंना ते पद स्फुरले होते त्या अष्टसात्विक अनुभवाचे ते प्रकटीकरण होते. आता पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना असतानाच प्रभूंनी एकतारी हातात घेतली. मंगल तारी व प्रकाश तारी गेली कित्येक वर्षे प्रभूंशी स्वतंत्रपणे जोडली गेली आहेत. या प्रवासात त्यांच्या लौकिक जीवनातल्या भूमिका बदलत गेल्या तरीही उभयतांची प्रभूंविषयी व्यक्तिगत श्रध्दा व निष्ठा अबाधित राहिली होती उभयतांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भाव प्रकट करण्यास , त्यांना बोलते करण्यास प्रभू प्रेरित करत होते. खरं तर या संवादाच्या माध्यमातून प्रभंची एकूणच निष्ठावंत भक्तांविषयी असलेली आत्मियता व स्नेहभावाची जाणीवप्रेमीजनांना होत होती. संवाद संपता संपता सभागृहातील मंत्रमुग्ध वातावरणात प्रभूंनी भगवंताशी नाते जोडणारी एकतारी छेडण्यास सुरुवात केली . 'राम कृष्ण कृष्ण हरी मंगल नाम एकतारी'देव नि भक्त काय हे नाते तेचि फक्त जाणती ते.दैवी संगीताचा तो एक अविस्मरणीय आविष्कार होता . सर्वांचेच देहभान हरपले होते. पुढे काय झाले ? ते पुढील अध्यायात . आनंदासी घेतो प्रेमे ... .श्रीपरमानंदस्वामीर्पणमस्तु.
-
491
Episode 499 as on 17th April 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th April 2026सुप्रभात, ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतंगमय । ॐ शांतिः शांतिः शांति: ॥प्रभूंबरोबरचा हा मायेपासून सत्यापर्यंतचा, अंधारापासून प्रकाशापर्यंतचा मृतापासून अमृतापर्यंतचा एकूणच अशाश्वतापासून शाश्वतापर्यंतचा असा आनंददायी प्रवास . जय परमानंद प्रिय परमानंद गोविंद परमानंद 🙏🙏🙏
-
490
Episode 498 as on 14th April 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 14th April 2026देवावरती प्रेम जडले। देवप्रेमे जीवन घडले। जीवनातल्या अनुभवलेल्या आनंदा गातो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥ भाऊंच्या घरी नियमीत येत असलेल्या अन्य काही मंडळींचा उल्लेख मागल्या एपिसोडमध्ये अनावधानाने करायचा राहून गेला. सत्यविजय रेवाळे , प्रमोद , शारदाताई ,वीणा ठाकरे परिवार , अंजली , मधुरा कुलकर्णी ही मंडळी सुध्दा येत असत . पुढे पुढे सौरभ , मुद्रा , वंदनाजी कपूर सुध्दा यायला लागले . शहापूरची मंडळीही काही दिवस येत होती. हा परमानंद प्रभूंच्या प्रेमाचा गोतावळा होता. भाऊ व सरोजवहिनी अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत करत असत .बरोबर 7.00 वाजता प्रभूंच्या जयजयकाराने कार्यक्रमाला सुरुवात होत असे. प्रभूंच्या प्रतिमेला व पादुकांना भाऊंनी पुष्पहार घालून वंदन केल्यावर स्तोत्रगायन होत असे. भाऊ सर्वांनाच सामावून घेत असत. दोघा तिघांना पदगायनाची संधी मिळत असे. पदगायनाची सांगता मात्र नेहमी सत्यविजय रेवाळ्यांच्या गोड आवाजात होत असे. त्यानंतर एखाद्या प्रेमीभक्ताचे भावपूर्ण मनोगत. हा सगळा क्रम ठरलेला असायचा. प्रभूंचे माहात्म्य माझ्या ह्रदयात ठसण्यामध्ये या प्रेमीभक्तांच्या प्रकटीकरणाचे फार मोठे योगदान आहे. प्रेमाने रंगलेल्या भाविकांचा थोडासा रंग मलाही लागलाच . विषय तो एकच नारायण. इथे आदानप्रदान विचारांचे नव्हते तर प्रभूंविषयीच्या प्रत्येक प्रेमीभक्ताच्या भावाचे व प्रेमाचे होते . भाऊंचे निरूपण म्हणजे षडरस भोजनाची मेजवानीच. समर्पित जीवनाचा अद्भूत आविष्कार. विविध प्रभूप्रेमरंगांनी फुललेले व विस्तारलेले कारंजे ज्याचे मूळ भाऊंच्या अंतःकरणात होते . त्या कारंजाचे तुषार माझ्याही अंगावर पडायचे हा एक आनंददायी अनुभव होता. प्रभू हाच एकमेव विषय पण तो दरवेळेस नित्य नाविन्याने प्रकट व्हायचा. प्रभूंचा प्रदीर्घ सहवास, प्रत्येक बर्यावाईट प्रसंगात प्रभूंना दिलेली साथ , प्रभूंवरील असीम श्रध्दा , निष्ठा व सर्वांगाने असलेले प्रेम व या सर्व गुणधर्मातून उद्भावलेले प्रभूमय जीवन भाऊंच्या शब्दा शब्दातून उलगडत असे. भाऊंकडून प्रकट होत असलेले प्रभूमाहात्म्य माझ्या उमेदवारीच्या काळात मला प्रेरणादायी ठरत होते . म्हणूनच त्या काळात अनुभवलेल्या आनंदाचे गायन आजही माझ्याकडून होत आहे . आनंदासी घेतो , प्रेमे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
489
Episode 497 as on 10th April 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th April 2026सहवासात प्रेमप्रसंग। घडला देवप्रेमसंग। स्मृतीतल्या जपलेल्या प्रेमा प्रगटवितो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥ भाऊंकडे जा असे प्रभूंनी सुचविले आणि पुढल्याच शनिवारपासून मी भाऊंकडे जायला सुरुवात केली. परमेश्वर, पाटणकर दांपत्य , खेर दांपत्य, पंडीत दांपत्य तसेच चंद्रकांत ओहळ , सुधा राठोड ही मंडळी आधीपासूनच येत होती . दत्तपीठात प्रभूंचे तेजोवलय असे तर इथे भक्तिमय वातावरण. प्रभू प्रत्यक्ष उपस्थित नसताना मंडळी विलक्षण भावपूर्णतेने प्रभू माहात्म्य व गुणगायन करीत असत . प्रत्येकाच्या जीवनात प्रारंभीच्या काळात असलेली प्रभूंची प्रमुख भूमिका पुढे एकमेव भूमिका कशी होत गेली याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख येत असे. प्रत्येकाला आलटूनपालटून भाव व्यक्त करण्याची संधी मिळत असे. माझ्याकडील कार्यक्रमात व भाऊंकडील कार्यक्रमात एक मूलभूत फरक मला जाणवला की माझ्याकडे जी काही मंडळी येत असत ती प्रभूंशी तशी जोडली गेलेली नव्हती आणि इथे तर बहुतेक सर्वजण प्रभूंचे प्रेमीभक्तच. अपवाद म्हणून नाही म्हणायलाक्वचित कधीतरी एखादी त्रयस्थ व्यक्ती असायची. परिणामी जमलेल्या सर्व मंडळीचा प्रभूप्रेमाचा एकच सूर एकच स्वर एकच ताल तुझाचि जयजयकार देवा तुझाचि जयजयकार. या भारित वातावरणामुळे प्रभू प्रेममाहात्म्य मनात व अंतःकरणात ठसत गेले. मंगळवार, गुरुवारला आता पूरक अशी शनिवारची जोड मिळाली होती मंगळवारचा प्रभूंशी संवाद, गुरुवारचे प्रभूंचे निरूपण वशनिवारचे भाऊंसह प्रेमीभक्तांचे भावपूर्ण हृदगत असा तिन्ही अंगांनी आयुष्याकडे पहाण्याचा व आत्मचिंतनाचा एक नवीन दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रवास सुरू झाला होता . आनंदासी घेतो प्रेमे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
488
Episode 496 as on 7th April 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 7th April 2026देवापासी करून मोकळे। अंतर प्रेमे भरूनी घेतले। अंतरातल्या दाटलेल्या प्रेमा वाहवितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥ देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कळत नव्हते. मनोविजय ग्रंथाचे दोनदा पारायण झाले होते. रे मना देहाशी न खेळता आत्म्याशी खेळ असे अवधूतप्रभूंनी म्हणून ठेवले होते. मी देह नाही मी आत्मा आहे पण देहरूपाने जीवन जगत आहे ही माया असली तरी वस्तुस्थिती होती . आत्मरूपाने जीवन कसे जगायचे ? सगळचं डोक्यावरून जात होते. प्रभू आत्मज्ञानी आहेत आणि सगुण रूपाने साकार आहेत म्हणून त्यांचा सहवास व त्यांच्याशी संवाद म्हणजेच आत्म्याबरोबरचा खेळ का ? मन पूर्णपणे मोकळे होत नव्हते . पण एक गोष्ट मात्र नक्की होती . मन प्रभूंकडे धावत होते . योग्य अयोग्य मज ना ठावे । मन माझे ते तुजकडे धावे . दृष्टीत परिवर्तन घडत होते पण प्रभूंच्या अंतःकरणाचा वेध कसा घ्यावा हे कळत नव्हते. माझी ही कुचंबणा प्रभूंच्या लक्षात आली. आता या मार्गात एक नवीन वळण येऊ घातले होते. प्रभूंच्या अंतःकरणाचा वेध घेण्याची दृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर ज्यांची दृष्टी परिपक्व झाली आहे अशा मातब्बर भक्तांचा सहवास घडणे आता आवश्यक होते. मतिमंद तो साधनायोग्य झाल्यावर पुढील साधना करण्यासाठी दत्तपीठाला पूरक असे योग्य स्थान म्हणजे भाऊंचे पादुकामंदिर होते. भाऊंच्या शुध्द अंतःकरणातून मुखावाटे घडणाऱ्या प्रभूगुणसंकीर्तनातून माझ्याठायी प्रभूंच्या अंतःकरणाचा ध्यास लागण्याची शक्यता निर्माण होईल याची प्रभूंना खात्री होती. आणि म्हणून त्यांनी सुचविले की आता घरी कार्यक्रम न करता भाऊंकडे शनिवारी जात रहा. शिल्पकार मूर्ती घडवताना अनेक प्रयोग करत असतो . माझा जीवनप्रवासात एक नवीन अध्याय सुरू होत होता . आनंदासी घेतो प्रेमे ... श्रीपरनंदार्पणमस्तु.
-
487
Episode 495 as on 3rd April 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd April 2026देवाच्या त्या प्रेमासाठी। घडल्या देवप्रेमभेटी। भेटीतल्या साठवलेल्या प्रेमा दाखवितो । देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो ॥ मनोविजय ग्रंथाचे वाचन चालू होते. मनाची शते वाचता वाचता मनाचे दोष जायच्या आधी दृष्टीवरील मळभ दूर व्हायला सुरुवात झाली होती. मनाचे दोष दिसायला लागले होते. मनोविजय ग्रंथ वाचनाचा मोठ्यात मोठा लाभ झाला असेल तर दृष्टी सुधारायला लागली होती व दोषांची जाणीव व्हायला लागली होती . अर्थात केवळ जाणीव झाल्याने दोष जातात असे नव्हे पण मन आता साधना करण्यास योग्य असे होऊ घातले होते व काय साधायचे आहे याची थोडीफार कल्पना आली होती. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला लक्ष्यावर बाण सोडण्यास संमती दिली कारण अर्जुन आता साधनायोग्य झाला होता. संमती देण्यापूर्वी अर्जुनाच्या दृष्टीतील दोष दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता व दृष्टी साफ होईपर्यंत त्यांनी संयम बाळगला होता . अर्जुनाला फक्त लक्ष्य दिसायला लागले व इतर गोष्टी दिसेनाशा झाल्या ही दृष्टी बदलल्याची खूण होती . संकेत होता. मतिमंद ते साधनायोग्य होती. भूमी तयार झाली होती. बीज रोवण्याचा शुभसमय आला होता .आता लक्ष्य गाठायचे आहे. अर्जुना , चल उचल ते धनुष्यबाण आणि वेध घे त्या लक्ष्याचा, द्रोणाचार्यांनी आज्ञा केली.मनोविजयाच्या माध्यमातून प्रभूच मार्गदर्शन करत होते.मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ही सुरुवात होती. ग्रंथ संपत आला तसे प्रभू कुठे निर्देश करत आहेत हे लक्षात यायला लागले होते. भक्तिमार्गाने वाटचाल करत शोध कशाचा घ्यायचा ? वसे हृदयी देव तो कोण कैसा । पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ॥ या प्रश्नापर्यंत प्रभूंनी मला आणले होते. प्रापंचिक दृष्टी लोप पावत होती व पारमार्थिक दृष्टीचा उदय होत होता. मनोविजय ग्रंथाची ही फार मोठी उपलब्धी होती . प्रभूंच्या प्रयत्नाला यश येत होते . अर्जुना तू जाण रे ।होसी बा सुजाण रे । विश्व नाही मीच आहे। सखया तुझी आण रे ॥ अर्जुना तू जाण रे । देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे आहे . माझ्याच अंतःकरणात प्रभूंना पहायची दृष्टी यायला अजून अवकाश होता .देवाचे या प्रेम घेऊनी .. श्रीपरमानंदार्पणमस्तु .
-
486
Episode 494 as on 31st March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 31st March 2026 देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आम्ही श्रीभवानंदस्वामी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जमलो. आम्ही चौघे नव्याने सुसंस्कारित प्रेमीजन तसेच अन्य काही मंडळी उपस्थित होती . भाऊंनी सर्वांचे स्वागत केले व प्रभूंनी प्रास्ताविक केले. त्या छोटेखानी निवेदनातून प्रभूंनी पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली. एव्हाना मला अंदाज यायला लागला होता. माझ्या मनात विचार येत होते कार्य आता केवळ चर्चेपुरतं मर्यादित रहाणार नाही . कार्याला निश्चित असे कारण असायला हवे . कार्य जीवनोन्मुख झाले तरच जीव जीवभावापासून अलिप्त होईल व मनाचा कल ईश्वराभिमुख होण्याची शक्यता निर्माण होईल . मी असा विचार करत असताना अनपेक्षितपणे प्रभूंनी मला थोडक्यात बोलायला सांगितले . मी प्रभूंनी गुरुमंत्राचा संस्कार केला व नुसता संस्कारच नाही तर तीन टोकांच्या त्रांगड्यामधून सुटका केली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आता मी आणि प्रभू अशी दोनच टोके उरल्यामुळे माझा मार्ग आता प्रशस्त, सुगम व सुकर झाला होता . भाव एकदिशीय करणे आता सुलभ होणार होते . दरम्यान आणखी एक विशेष घटना घडत होती. महाराज असल्यापासून दत्तपीठामध्ये दत्तप्रभूंच्या पादुका प्रतिष्ठापित होत्या. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर परमानंदस्वामींनी त्या पादुकांची स्थापना त्यांचे परमभक्त व परमस्नेही श्रीभवानंदस्वामी यांच्या निवासस्थानी प्रस्थापित केल्या.हा एक विलक्षण दुग्धशर्करा अमृतयोग होता. भाऊंच्या दृष्टीने तर परमभाग्य उदयास आले होते . कृपये परमानंद फळे. भाऊ कृतकृत्य झाले होते व आपल्या भावपूर्ण मनोगतातून त्यांनी प्रभूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली . भाऊंचे निवासस्थान आता पादुकामंदिर झाले होते. या मंदिरातच आता प्रभूंचे गुणगायन अनवरत होणार होते . भविष्य काळात मलाही त्याचा लाभ होणार होता . कार्यक्रमाचा समारोप प्रभूंच्या निरूपणाने झाला . " आतापर्यंत कार्य घडत राहिले पण त्याचा नेमका कुणाला काय लाभ झाला याचा कधी विचार आपण केला आहे का ? जे काही घडत गेले त्याला कार्य तरी कसे म्हणावे ? कार्य तेच जे बुध्दीला प्रगल्भ करते . शुध्द व निश्चयात्मक बुध्दी मनाला आनंदाचा शोध घ्यायला प्रवृत्त करते . पण मनाच्या ठिकाणी संसारभाव असतो म्हणून आम्हाला प्रथम जीवाच्या जीवनात व नंतर मनात प्रवेश करायला लागतो. सद्यस्थितीत शब्दबंबाळ बुध्दी या प्रकियेच्या आड येत आहे आणि मनाला व्यापक आनंदाच्या अनुभवापासून दूर नेत आहे . जीवन कार्यापासून व कार्य जीवनापासून अलिप्त राहू शकत नाही . म्हणून आता कार्याची फेरमांडणी करणे आवश्यक आहे . आजचा दिवस महत्वाचा आहे . आज कार्य कात टाकत आहे . आजच्या गुरुमंत्र संस्काराने या नवीन कार्याचा श्रीगणेशा झाला आहे .येणाऱ्या काळात इथे फक्त भक्तीचा बोलबाला असणार आहे पुस्तकी ज्ञानाचा नाही. हा नियतीचा शुभसंकेत आहे. आमचे सर्वांना आशिर्वाद आहेतच " प्रभूंच्या चेहर्यावर तेजस्विता होती. 'हा राम माझा ' च्या लिखाणातून त्यांनी बदलत्या कार्यस्वरूपाची चुणूक दाखवली होतीच . आता अधिक जोमाने प्रभू कार्यरत होणार होते . प्रभूंच्या जीवनचरित्रात हा एक निर्णायक टप्पा होता . या एका दिवसात माझ्याही भक्तिजीवनात आमुलाग्र बदलाची चाहूल लागली होती . आता एकीएक भावाचा प्रवास सुरू झाला होता. देवाचे या प्रेम घेऊनी.... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
485
Episode 493 as on 27th March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th March 2026देवप्रेम असे एक थोर भारी ।अनुभवाने ते जाणवे अंतरी ।त्या प्रेमाविण अन्य मी नेणिले -। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥ त्या वर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारीच होती. 2001 का 2002 साल असावे. प्रभूंनी सकाळी आम्हा चौघांवर गुरुमंत्राचा संस्कार करण्याचे योजिले होते. मी विचार करत होतो. उपासना मंत्राच्या संस्काराच्या पाठोपाठ लगोलग गुरुमंत्राचा संस्कार करण्याची उर्मी प्रभूंना का बरे आली असावी ? दत्तपीठात काहीतरी वेगळ घडतयं असे जाणवत होते पण नेमके काय घडतयं ते कळत नव्हते. मात्र प्रभूच्या चेहर्यावर एक प्रकारे निश्चयात्मकता दिसत होती. प्रभूंप्रती दृढ श्रध्दा होती व जे घडेल ते चांगलेच घडेल असा विश्वास होता. नामकरण विधीचे सोपस्कार पूर्ण झाले . प्रभूंनी त्यांच्या छोट्याशा निवेदनात गुरुसंस्काराचे व शिष्यभावाचे महत्व समजावून सांगितले. " " पूर्वी शिष्य सद्गुरूंच्या शोधात असत . आता असे शिष्य दुर्मीळ आहेत म्हणून सद्गुरूच पुढाकार घेऊन संस्कार करतात. गुरूशिष्य नात्यातून गुरूशिष्य संबंध निर्माण होणे महत्वाचे. जसजसे हे संबंध घट्टहोत जातील तसतसा शिष्यभाव दृढ होत जाईल. यास्तव सद्गुरूंना जीवनात केवळ प्राधान्यच नाही तर संपूर्ण शरण जाऊन आपले जीवन समर्पित करणे हेच स्वधर्माचरण होय. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणम् व्रज . तुम्हाला चौघांवर आनंदस्वामी म्हणून एकत्रितपणे संस्कार झाला आहे. म्हणून प्रत्येकाचे जरी स्वतंत्र आध्यात्मिक बारसे झाले असले तरी त्या नामांमध्ये एक समान सूत्र आहे व म्हणून परस्परांचे हात हातात घेऊन व सलोख्याचे संबंध राखत सर्वांनी एकदिलाने ते संयुक्त सूत्र सार्थ करायचे आहे " प्रभूंचे निवेदन झाल्यावर अल्पोपाहार झाला व आम्ही निघालो . एवढ्यात प्रभूंनी मला गॅलरीत बोलावून घेतले. " आज संध्याकाळी गुरुपौर्णिमेचा मोठा कार्यक्रम हाॅलमध्ये नाहीए . पण भाऊंकडे भेटून पौर्णिमा साजरी करून या. भाऊंकडून पत्ता घ्या . आपण 6.00 वाजता भेटू या . " मी हो म्हटलं आणि निघालो. पण मनात विचारचक्र सुरू झाले. नक्की काय घडतयं याचा अंदाज येत नव्हता . इतर कोणाशी चर्चा करण्याचा प्रश्न नव्हता आणि आता प्रभूंचेच सांगणे माझ्याकरता प्रमाण व अंतिम असल्यामुळे तशा चर्चेची आवश्यकताही नव्हती. अर्थात गुरुमंत्राच्या संस्काराच्या त्या शुभदिनापासून माझ्या भक्तिजीवनाच्या सुगम नांदीचे शुभसंकेत मिळायला प्रारंभ झाला होता , हे नक्की. संध्याकाळी काय घडले ? खूप काही घडले. जे काही घडले ते तसे घडणे आवश्यकच होते . तो एक स्वतंत्र एपिसोडचा विषय आहे . देव हृदयीचे प्रेम ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
484
Episode 492 as on 24th March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th March 2026देवप्रेमगुण असे आनंदाचा । स्वये घेऊनिया सर्वांसी देण्याचा। त्या प्रेमगुणासी अंगी मी बाणिले। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥गर्गेस्वामींच्या फार्महाऊसवर सुंदरवन वृंदावनात प्रभूंच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीचा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने होत असे . या कार्यक्रमाला दूरदूरवरून भक्तमंडळी येत असत . प्रभूंच्या सहवासात मेळाव्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध रंगत असे. पूर्वरंग प्रामुख्याने प्रभूंचे निरूपण व उत्तररंगात भक्तमंडळींबरोबर अनौपचारिक संवाद व त्यावर प्रभूंची हसत खेळत मार्मिक टिप्पणी रंगत असे .पण अशाच एका कार्यक्रमला थोडेसे गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. प्रभूंच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त होते. प्रभूंनी व्यवधान घेतले होते. इतरांच्या दुःखाबाबत प्रभू अतिशय संवेदनाक्षम आहेत. नेहमीप्रमाणे प्रार्थना, स्तोत्र झाल्यावर गर्गे पतीपत्नींचे मनोगत व्यक्त झाले व प्रभूंनी निरूपणास प्रारंभ केला" देहावर काळाची सत्ता आहे. देहाची काळजी घ्यायला हवीच पण देह काळाच्या स्वाधीन आहे याचे भान नित्य असायला हवे . कोण दिवस येईल कैसा याचा न कळे की भरवसा . म्हणूनच क्षण आणि क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण ईश्वराच्या कृपेने मिळाला आहे याची जाणीव ठेवून त्याचीच भक्ती घडत रहावी असेच आपले वर्तन असायला हवे. ईश्वराने सद्गुरूपाने निराकाराला साकार , अव्यक्ताला व्यक्त व निर्गुणाला सगुण करून भक्ती करायला संधी दिली आहे. सगुणाच्या सहवासात सगुणाशी संवाद करून ही संधी साधायला हवी . मी त्या परमात्म्याचा अंश आहे ही जाणीव दृढ झाली की मग 'खुणावतो काळ सर्वां मज ना त्याची भीती ना पर्वा ' या अवस्थेपर्यंत आपण येऊन पोहचतो. ही काळाच्या परती अवस्था आहे. मिळालेला प्रत्येक श्वास ईश्वराच्या ध्यासात व्यतीत केला तर मृत्युची भीती तर नाहीच उलट मुक्तीचा आनंद आहे. " प्रभू कितीतरी वेळ बोलत होते. मंडळी एकाग्रतेने श्रवण करत होती. नियती घडणाऱ्या घटना मानवी अवतारातील सगुण रूपालाही टाळता येत नाहीत .आपण त्या निर्गुणाची प्रार्थना करू शकतो . बोलता बोलता प्रभू एकदम गंभीर झाले व अनंत अशा अवकाशाच्या साक्षीने धीरगंभीर स्वरात आळवणी करायला लागले ' नमस्कार नमस्कार तुजसी नमस्कार, हे दत्तात्रेया तुजसी नमस्कार। ' सगुण निर्गुणाची आळवणी करत होते. आळवणी करताना स्वरातली व नेत्रातली आर्तता नेमकी जाणवत होती. सगुण प्रभू स्वतःच्याच अंतःकरणातील निर्गुण दत्तप्रभूंना आळवत होते. वृंदावनातले वातावरण भारून गेले होते . आजही प्रभूंचे ते रूप माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसले आहे . देवहृदयीचे प्रेम ....श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
483
Episode 491 as on 20th March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 20th March 2026
-
482
Episode 490 as on 17th March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th March 2026देव देत असे प्रेमअनुभव। स्वीकारुनिया तो माझा प्रेमभाव। देवघेवीने प्रेमासी मी गुणिले । देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥ कारेकर मंडळींचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बरोबर शिदोरी घेतली होती. गाडी यायला अजून अवकाश होता. म्हणून फलाटावरच्या विश्रामगृहातच भोजन करून घेतले. तेवढ्यात गाडी आली व एकच धांदल उडाली. लगबगीने सर्वजण गाडीत शिरले व आपापल्या सीटस् वर स्थानापन्न झाले. गाडीने मुंबई च्या दिशेने कूच केले व वेग वाढत गेला . मंडळीही आता बर्यापैकी स्थिरावली होती . प्रभूंबरोबरच्या त्या आध्यात्मिक सहलीचा आनंद परतीच्या प्रवासात ओसंडून वहात होता. त्या सगळ्या उत्साही वातावरणात प्रभूंबरोबर एकांतात संवाद साधण्याची संधी मी शोधत होतो. काही दिवसांपूर्वी प्रभूंनी मला एकूणच दत्तप्रभूंच्या कार्याचा झालेल्या लाभाविषयी काही लिखाण करायला सुचविले होते. मनन चिंतनाला जर लिखाणाची जोड मिळाली तर 'अधिकस्य अधिकं फलम् ' या उक्तीनुसार माझा ईश्वराविषयी प्रेम आणि भक्तिभाव दमदारपणे वाढण्याची दाट शक्यता प्रभूंना दिसत होती . मी लिहायला सुरूवात केली पण मंगळवारच्या किंवा एरवीच्या व्यक्तिगत भेटीत ते लिखाण प्रभूंना वाचून दाखवायचा योग येत नव्हता. आडवलीच्या प्रवासात अशी संधी मिळू शकते हे प्रभू जाणून होते. त्यांनीच मला तसे सुचविले होते व त्यांच्या ते लक्षातही होते. यथावकाश ते माझ्याजवळ आले मी माझ्या लिखाणाची पोतडी उघडली. मी दत्तपीठातील कार्याचा इतिहास लिहायला सुरुवात केली होती. गजाननस्वामींच्या संकल्पनेतील दत्तप्रभूंचे कार्य अवधूतस्वामींनी कसे समर्थपणे पूर्णत्वास नेले होते याचे वर्णन सुरुवातीच्या परिच्छेदांमध्ये आले होते. कार्यासंबंधी जे काही संबंधितांकडून ऐकले होते तेच लिहीण्याचा माझा प्रयत्न होता. दोन तीन पाने वाचून झाली होती आणि वाचता वाचता प्रभूंच्या चेहर्यावरील भाव मी न्याहळत होतो. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खिचडी जमली नाही याची जाणीव मला झाली . प्रभूंनी मला थांबवले व एवढेच म्हणाले , " ठीक आहे , छान. पण लिखाणात स्वानुभवाची सखोलता यायला हवी" एवढे बोलून प्रभू उठले व माझे विचारचक्र सुरू झाले. प्रभूंना काय सांगायचे आहे ? मी अंतर्मुख झालो व माझे प्रभू माझ्याशी बोलायला लागले . " इतिहासाचे वर्णन कुणीही करू शकतो . लिहिण्याचे अंग असेल तर दोन चार संदर्भ इकडचे तिकडचे घेऊन आणि ऐकीव माहितीवर लिखाण आकर्षक करता येईलही .पण तो फक्त शब्दांचा फापट पसारा , तिथे भावाचा अभाव असेल. जसे देव्हारा वेधक आहे पण आतमध्ये मूर्तीच नाही तर काय उपयोग ? आपले लिखाण इतरेजनांकरता नसून आपल्या प्रभूंकरता व स्वतःकरता असायला हवे. रामायणातल्या रामाच्या चरित्राचे चार ग्रंथ वाचून कुणीही वर्णन करेल पण माझ्या अनुभवाचा राम माझाच असणार आहे आणि तोच महत्वाचा आहे. स्वानुभवाचे लिखाणच चिंतन व मननाला पूरक ठरेल व भक्तिमार्गावर पुढे पुढे जायला उपयोगी ठरेल." गाडीने वेग पकडला होता व माझ्या विचारांनाही वेग आला होता. 'प्रभू एक मुख्य भक्तजीवनात '. प्रभू हाच एकीएक विषय असायला हवा . मनामध्ये , कृतीमध्ये , वाचेमध्ये व लिखाणातही. माझ्या भक्तिमार्गावरील प्रवासात हे एक टिकूजी-नी-वाडी सारखे महत्वाचे वळण होते. या वळणावर उमेदवारीचा काळ मागे पडून मी work in progress च्या अवस्थेत प्रवेश केला होता . देव हृदयीचे प्रेम... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
481
Episode 489 as on 13th March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 13th March 2026देवहृदयीचे प्रेम मी जाणिले। त्या प्रेमासी माझ्या हृदयी आणिले ॥ प्रभूंनी आपल्या घरी यावे असे सर्वच भक्तमंडळींना वाटते. असेच एक भक्त सूर्यकांत कारेकर. प्रभूंवर आत्यंतिक श्रध्दा व निष्ठा पण वास्तव्य दूर कोकणात . त्यामुळे प्रभूंची वारंवार भेट घेता येणे शक्य नसायचे. प्रभूंनी एकदा तरी आपल्या घरी यावे असे त्यांना मनोमन वाटत असे. तसे त्यांनी एकदा प्रभूंना बोलून दाखवले , नव्हे तसा आग्रहच धरला. भक्ताचा भाव जाणून त्याची इच्छा पूर्ण करणे हा तर प्रभूंच्या कार्याचाच एक भाग होता. कोकणात जायचे ठरले. भक्त मंडळी तर बरोबर हवीतच . पण घेणार कोणाला आणि वगळणार कोणाला ? शेवटी ज्यांची ज्यांची इच्छा होती त्या सर्वांनाच प्रभूंनी सामील करून घेतले व समस्त परमानंद परिवार आडवलीला निघाला. मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकात शिरली. सूर्यकांतने आप्तमित्रपरिवारासह प्रभूंचे चरणांवर मस्तक ठेवत लोटांगण घालून स्थानकावरच प्रेमपूर्वक स्वागत केले व प्रभूंसह सर्व प्रेमीजनांनी घराकडे प्रस्थान केले. चहापान व विश्रांतीनंतर मुख्य कार्यक्रम चालू झाला. आळवणी, स्तोत्रगायन, पदगायन व कारेकरमंडळींचे मनोगत यथानुक्रमे पार पडले व प्रभूंची अमृतवचने प्रकट व्हायला लागली. " प्रेमीजनांच्या भावाची आमच्या ठिकाणी नोंद असते व अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आधी त्याच्या जीवनात व यथावकाश त्याच्या मनात प्रवेश करण्याची संधी आम्हाला मिळते. आम्ही त्याला जवळ करतो पण ही जवळीकता त्याने टिकवून ठेवायची आहे . जेवढा तो आमच्या जवळ येईल व आमच्याकडे मन मोकळे करेल तेवढे आमचे प्रेम त्याला मनात भरून घेता येईल आणि मग संसारभावाने तो बाधित होणार नाही. त्यासाठी बाह्यांगाने दूर असूनही आमच्याशी संपर्कात रहाणे व संपर्कात सातत्य टिकवणे आवश्यक आहे. फोनवरून संपर्क हीसुद्धा एक प्रकारची सत्संगतीच आहे. अर्थात प्रत्यक्ष सत्संगती अमूल्य आहे हे तर खरचं. दूरवर असलेल्या जीवाचेही कल्याण व्हावे अशीच आमची तळमळ असते आणि म्हणून दूरस्थ व्यक्तिलाही ध्यास लागण्यासाठी काही सुविधा निर्माण करता येतील का याचाच विचार आम्ही करत असतो." असंख्य दाखले व दृष्टांत देत प्रभू त्यादिवशी कितीतरी बोलत होते. वेळेचे भान कुणालाच नव्हते. गाडी पकडून घरी जायची नेहमीची घाई नव्हती. प्रभू रंगले होते खर तर ते स्वतःतच रमले होते. सर्व मंडळींवर प्रभाव पडला होता . सूर्यकांत तर देहभान हरपून नाचायलाच लागला होता. जमलेली सर्व मंडळी त्याला उत्स्फूर्तपणे साद देत होती. भारलेल्या वातावरणात एक अतिशय रमणीय व भावपूर्ण सोहळा साकार होत होता. प्रभूंनी प्रकट केलेली वचने मनात व त्यांचे ते त्यादिवशीचे अतिअद्भूत आगळे वेगळे रूप नेत्रात मी साठवून ठेवत होतो. या कार्यक्रमाचा, विशेषत्वाने ' संपर्कात सातत्य' या संदेशाचा , माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला होता. रात्री कधितरी उशीरा प्रभूंनी कार्यक्रम आवरता घेतला. महाप्रसादाची वेळ झाली होती . आणि इथेही प्रभूंची एक अनोखी परी मनाला स्पर्श करून गेली. त्यांच्यासाठी भोजनाची विशेष व्यवस्था केली असतानासुद्धा त्यांनी भक्तमंडळींसमवेत भोजन करणे पसंत केले . असे हे आमचे परमानंदप्रभू . देवहृदयीचे प्रेम मी ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
480
Episode 488 as on 10th March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 10th March 2026भक्ताचिया अंतरात देवाचे ते दर्शन। भक्तासी करीतसे भक्तिमार्गदर्शन । परमानंद सुदर्शन नित्य अनुभवलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ चहापान झाल्यावर संवाद पुन्हा सुरु झाला . " कर्मकांडात अडकलेल्या मनाची पायपीट होते प्रवास होत नाही. घाण्याला जुंपलेला बैल मालकाला तेल देतो पण त्याला चरायला मात्र कडबाच मिळतो. संसारात खर्च केलेली अतिरिक्त उर्जा व्यर्थ जाते. समाधान कोणालाच मिळत नाही. कारण समाधान संसारभावात नाही तर भक्तिभावात आहे. पूर्वायुष्यातील संस्कार एका ठराविक मर्यादेपर्यंतच उपयुक्त ठरतात. प्रापंचिक जीवन प्रारब्धाधीन असल्यामुळे सुखदुःखाचे हिंदोळे आहेत. प्रारब्धावर मात करता येत नाही पण ईश्वराधीन जीवन प्रारब्धाला आपल्यामध्ये सामावून घेते व मनाला चिंतामुक्त करते. मनाला ईश्वराधीन करावे कसे या प्रश्नाचा शोध घ्यायला एखादा जीव जेव्हा संसारभावातून बाहेर पडतो तेव्हा भाग्याने त्याला त्याचा देव सद्गुरूरुपाने भेटतो. मनोविजय ग्रंथात म्हटल्याप्रमाणे मतिमंद आता साधनायोग्य होतात . सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. आनंदाचा मार्ग सद्गुरूंच्या अंतःकरणातून जातो याची जाणीव होते व त्यांच्या मार्गदर्शनाने भक्तिमार्गावर मार्गक्रमण करण्याचा निश्चय बळावतो. तुमचे संस्कार तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेत आता त्या संस्कारांना मागे ठेवून शाश्वताकडे नेणारी पुढची वाटचाल करायची आहे ." प्रभूंची नजर माझ्यावर स्थिरावली. आता नजरेतून मुकसंवाद सुरू झाला होता. ती नजर , ते मौन शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरत होते. प्रभू आता स्वानंदात रममाण झाले होते व मला काय बोलावे ते सुचत नव्हते . माहौल शांततेचा होता व माझे मनही शांत झाले होते . असा कितीतरी वेळ गेला . शेवटी प्रभूच त्या शांततेचा भंग करत हलक्या फुलक्या स्वरात व मोकळेपणाने हसत म्हणाले , " अरे , आज तुमचा वाढदिवस ना ? तुम्ही पार्टी तर द्यायलाच हवी." माझ्या मनावरील दडपण एकदम कमी झाले व आम्ही सर्वजणहसत खेळत हाॅटेलला जाण्यासाठी बाहेर पडलो. जेवण झाल्यावर टिकूजी-नी-वाडीत प्रभूंशी झालेला संवादाचे मनन व चिंतन करीतच मी घरी परतलो . आजही त्या संवादातून प्रभूंनी दिलेला संदेश माझ्या मनात घर करून आहे , टिकून आहे . देवा तुझ्या दर्शनाला ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
479
Episode 487 as on 6th March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 6th March 2026तुझ्या प्रेमानेची वाटे मनासी ते हलके। तुझ्या बोधे जीवन होई हलके नि फुलके। प्रेमस्मरणात तुझ्या माझा मी तो हरवलो । देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हटलयं . संतसत्पुरुषांचा पदस्पर्श आपल्या घराला व्हावा ही केवढी भाग्याची गोष्ट! त्यातूनही पहिल्यांदाच गोवत्सद्वादशी वसूबारसच्या दिवशी प्रत्यक्ष प्रभूंनी माझ्या घरी यावे ही गोष्ट दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी होतीच पण त्याहीपेक्षा त्या शुभमुहूर्तावर प्रभूंच्या साक्षीने माझ्या भक्तीजीवनाच्या प्रारंभाची नांदी ठरणारी होती. प्रभू शशीताईंकडे पवईला आले होते. ऑफिस मधून लवकर निघून मी शशीताईंकडे पोहचलो व तिथून प्रभूंना घेऊन घरी आलो. प्रभू येणार म्हणून शेजारीपाजारी व नातेवाईकांना मी बोलावले होते. मी दादरला श्रीपरमानंदस्वामींकडे नियमितपणे जातो हे सर्वांना ठाऊक झाले होते. त्यामुळे तेही सर्वजण स्वामींचे दर्शन घ्यायला उत्सुक होते. सर्वजण वाटच पहात होते. प्रभूंनी घरात प्रवेश केला. सर्व खोल्यांमधून फिरले , घरच्या मंडळींचे क्षेमकुशल जाणून घेतले व मग हाॅलमध्ये त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. इतक्यात एक तीन चार वर्षाचे निरागस लहान बालक त्यांच्याजवळ जाऊन बसले. त्याची आई चपापली व त्याला दटावत त्याला उचलून घ्यायला पुढे आली. प्रभूंनी त्या माऊलीला खूण केली व बालकाला अधिकच जवळ घेतले. निरागसतेने निरागसतेकडे झेप घेतली होती. प्रभूंकडे लहान बालकासाखीच पण ज्ञानोत्तर निरागसता आहे याचा प्रत्यय मला व तिथे जमलेल्या सर्वच मंडळींना आला . प्रभूंच्या याच निरागसतेची प्रचिती पुढे मला वारंवार येत राहिली. संतसत्पुरुष घरी आल्यावर त्यांची पाद्यपूजा करण्याची एक प्रथा आहे. तिथे जमलेल्या मंडळींनी विशेषत: स्त्रियांनी प्रभूंची पाद्यपूजा करण्याची इच्छा व्यक्त केली प्रभूंच्या लेखी असे प्रघात अनावश्यकच पण तरीही प्रभू तयार झाले हे प्रभूंचे उमदेपण. चरणक्षालन , हळदीकुंकू स्वस्तिक, धूपदीपओवाळणी ही सर्व कर्मे यथासांग पार पडली. प्रभूंनीही सर्वांना ओवाळणी भेट देऊन भरभरून आशिर्वाद दिले. पाद्यपूजा पार पडल्यावर प्रभूंनी सर्वांना जवळ बसवून घेतले आणि मग प्रत्येकाशी व्यक्तिगत संवाद साधायला सुरुवात केली. " भक्तिमार्गात ईश्वराशी ऐक्यत्व पावलेल्या संत सत्पुरुषांचे केवळ पूजन पुरेसे नाही तर भजन , कीर्तन व गुणगायनही आवश्यक आहे. भक्तिमार्गात कर्माचे अवडंबर नाही तरीही जी कर्मे करायची आहेत ती ईश्वरी भावाने करायची आहेत व ईश्वरालाच अर्पण करायची आहेत. ही दृष्टी येण्यासाठी संत सत्पुरुषांचा नियमित सहवास आवश्यक आहे. आमच्या रहात्या घरी दत्तप्रभूंचे कार्य नियमितपणे चालू आहे व तिथे सर्वांना ही संधी उपलब्ध आहे. तुमचेही या कार्यात स्वागत आहे. " अतिशय संस्मरणीय अशी प्रभूंची ही माझ्या स्वगृही झालेली पहिलीवहिली भेट. हा प्रसंग आजही माझ्या मनात ताजा ताजा आहे. प्रभूंच्या व्यक्तिमत्वाचा जनमानसावर प्रभाव पडतोच . पण माझ्या मनावर विशेष परिणाम झाला होता . आपण योग्य ठिकाणी आलो आहोत अशी मनाची खात्री झाली .प्रभूंना परत घेऊन जाताना प्रभूंच्या चरणाशी रहाण्याचा मनाचा निश्चय अधिकच दृढ झाला. देवा तुझ्या दर्शनाला ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
478
Episode 486 as on 3rd March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 3rf March 2026भाव माझा घ्यावे तुझे दर्शन ते केवळ। बैसविले मज प्रेमे चरणी तू जवळ। हास्य मुखी देखुनीया मनी मी सुखावलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ प्रभूंबरोबरचा प्रवास हा नेहमीच आनंददायी अविस्मरणीय असे. संभाषणाला एक खुमारी असे. मस्त मोकळा एक्सप्रेस वे, प्रसन्न वातावरण, हलकीशी पावसाची धार , गाडी टाॅप गिअरमध्ये व सर्वात महत्वाचे म्हणजे शेजारी साक्षात प्रभू. स्टिअरिंग व्हील जरी माझ्या हातात असले तरी प्रवासाची दिशा ठरवणार प्रभू. आपल्याला काय ? प्रभूंनी सरळ जा सांगितले की सरळ जायचे , वळायला सांगितले की वळायचे. थांबायला सांगितले की थांबायचे. जीवनाची सूत्रेच प्रभूंकडे सुपूर्द केली होती. असाच प्रवास करत एक दिवस आम्ही तळेगाव मुक्कामी पोहचलो. संत तुकारामांचे देहू गाव तळेगावच्या जवळच आहे. ज्या भंडारा डोंगरावर बसून तुकारामांनी पांडुरंगाची अखंड आळवणी केली त्या पवित्र स्थानावर जाण्याचा मानस प्रभूंनी व्यक्त केला . भोजन व विश्रांती झाल्यावर संध्याकाळी आम्ही भंडारा डोंगरावर जायला निघालो. वळणावळणाच्या नागमोडी रस्त्याने आम्ही पायथ्यापासून शिखरावर पोहचलो . शिखरावर तुकारामांचे अप्रतिम मंदिर आहे. भावपूर्ण अवस्थेत प्रभूंनी तुकारामांचे दर्शन घेतले व त्याच भारावलेल्या अवस्थेत मंदिराबाहेर असलेल्या एका खडकावर जाऊन बसले. जरा विसावू या वळणावर. मावळतीच्या सूर्याकडे टक लावून बघत असताना उत्स्फूर्तपणे प्रभू गायला लागले . " या देहाचिया गावी। काय झाली हो नवलाई। जन्मोजन्मीची पुण्याई ।भाग्ये भेटली विठाई ॥ " प्रभूंचे ते भावविभोर रूप मी अनिमिष नजरेने पहात होतो. तुकारामांची विठाई प्रभूंना नुसती भेटलीच नव्हती तर प्रभूंच्या अंतःकरणात खोलवर उतरली होती. प्रभू , पांडुरंग व तुकाराम असा त्रिवेणी संगम प्रभूंच्या ठिकाणी पहाण्याचे भाग्य मला लाभले होते. या तद्रूप अवस्थेत किती वेळ गेला कुणास ठाऊक! पण त्या देहातीत अवस्थेतही प्रभूंचे देहभान जागृत होते. 'आता निघू या' प्रभू म्हणाले . घरी कार्यक्रम होता. जवळपासची मंडळी येणार होती. तुकारामांना बरोबर घेऊन प्रभू घरी जाण्यास निघाले. देवा तुझ्या दर्शनाला ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
477
Episode 485 as on 27th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th February 2026भक्ताला देवाचा तो प्रेमगुण लागू दे। देवप्रेमे जीवनची सर्व अंगे रंगू दे। परमानंद अनुभव नित्य उपभोगू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ त्या दिवसांमध्ये रविवारी सकाळीही प्रेमीजन दत्तपीठात प्रभूंना भेटायला जात असत. मीही रविवारची सकाळ सहसा चुकवत नसे. संध्याकाळी प्रभूंचे निरूपण असायचे. अशाच एका रविवारी सकाळी मी दत्तपीठात गेलो होतो. त्या दिवशी , रत्नाकर पुराणिक , माझ्या मामेभावाला तिथे पाहून मला आश्चर्यच वाटले. मी त्याला त्यापूर्वी कधीच दत्तपीठात पाहिले नव्हते किंवा आमच्या बोलण्यामध्ये दत्तपीठाचा विषय कधीच आला नव्हता. मी तिथे पोहचलो तेव्हा तो प्रभूंशीच बोलत होता. त्याच्या आईचे म्हणजे माझ्या मामींचे , वसुंधरादेवींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या प्रभूंच्या भक्त होत्या. पण मी प्रभूंकडे जायला लागल्यापासून आमची कधीच गाठ पडली नव्हती. त्यांनी प्रभूंच्या चरणी विलीन होण्यापूर्वी प्रभूंच्या नावाने काही रकमेचा चेक तयार केला होता व आपल्या पश्चात प्रभूंनी त्याचा स्वीकार करावा अशी प्रभूंना प्रार्थना करणारी चिठ्ठी लिहून ठेवली होती . तो चेक देण्याकरताच रत्नाकर प्रभूंना भेटायला आला होता . आता प्रभू कधीच कोणाकडून धनाचा स्वीकार करत नाहीत हे मला एव्हाना माहीत झाले होते. म्हणून प्रभू चेक स्वीकार करणार नाहीत असा माझा अंदाज होता. पण प्रियजनांचे अंदाज खरे ठरवतील ते प्रभू कसले. त्यांनी तो चेक हातात घेतला. शांतपणे कपाटातून आपले चेक बुक काढले, वसुंधरादेवींनी अर्पित केलेल्या रकमेचे दोन समान भाग करून त्यांच्या दोन्ही सुनांच्या नावाने दोन चेक तयार केले व ते रत्नाकरच्या स्वाधीन केले . प्रभूंची निस्पृहता माझ्या अंतःकरणाला खोलवर स्पर्श करून गेली. निस्पृहतेचा परिचय देताना प्रभूंनी धनाचा नाही तर भक्ताच्या अंतिम इच्छेचा स्वीकार केला होता, मान ठेवला होता. ' मूल्य धनाचे काय मुनीजना अवघ्या आशा श्रीरामार्पण ' धनाचे नाही पण भक्ताच्या भावाचे मूल्य मात्र प्रभू जाणून आहेत . प्रभूंच्या या अशाच छोट्या छोट्या कृतींमुळे दत्तपीठात माझे मन संस्कारक्षम बनत गेले . भक्ताला देवाचा तो प्रेमगुण लागू दे . देवा तुझ्या प्रेमाचा तो... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
476
Episode 484 as on 24th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th February 2026प्रेमे युक्त अंतरात तूचि अससी मोकळा। मोकळेपणाने मज लाविसी त्या प्रेमकळा। प्रेमाची मोकळीक मजसी ती भावू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ प्रेमीभक्तांना आपला जास्तीत जास्त सहवास मिळावा यासाठी प्रभू प्रयत्नशील असत. गुरुवारचे निरूपण व इतर वारी नित्यनेमाने भेटी होत असतच पण कुठल्याही निमित्ताने किंवा निमित्त नसले तरीही प्रेमीभक्तांना त्यांच्या घरी भेटण्यास प्रभू नेहमीच उत्सुक असत. असा काही कार्यक्रम ठरला की प्रभू अन्य काही भक्तमंडळींना देखील सामावून घेत असत . एके दिवशी असेच प्रभू मुलुंडला त्यांचे प्रिय भक्त परमेश्वर वाघमारे यांच्याकडे येणार होते. त्यांनी तिथे मलाही बोलावून घेतले. काही प्रेमीभक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम चालू झाला. सुरूवातीची स्तोत्र , पदगायन झाल्यावर अनपेक्षितपणे आणि अचानकपणे प्रभूंनी मला बोलावयास सांगितले . सहाजिकपणे माझ्या बोलण्यात मनोविजय ग्रंथाचा विषय आला. सद्गुरू व संतपुरुषांचे रामदासस्वामींनी केलेल्या वर्णनाच्या अनुषंगाने मी बोलत होतो.' दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जगी दासपाळू । तया अंतरी क्रोध संताप कैचा ।' मी श्लोक पूर्ण करण्याआधीच प्रभूंनी मला थांबवले. " संतसत्पुरुष व सद्गुरू दोघांचेही अंतःकरण कोमल असते व जीवाविषयी दोघांनाही कळवळा असतो. संतसत्पुरुष जीवाला सुखावतात व त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करतात. ईश्वरावरती श्रध्दा ठेवायला सांगतात . पण सद्गुरूंचे तसे नसते. त्यांना शिष्याला घडवायचे असते. सद्गुरूंच्या अंतःकरणातही संतसत्पुरुषांप्रमाणे क्रोधाचा लवलेश नसतो पण वेळप्रसंगी शिष्याच्या हिताकरता ते क्रोधाचा आविर्भाव प्रकट करतात .तेज प्रकट करतात . सत्ता ईश्वराची आहे याची जाणीव असूनसुद्धा , माझ्यावर श्रध्दा ठेव असे आत्मविश्वासाने सांगतात . कारण त्यांना शिष्याला घडवायच असत. त्यांचे तेज असेच अधूनमधून प्रकट होत असल्यानेच शिष्याला त्यांचा आधार वाटतो व तो अधिक जोमाने त्यांच्याशी जवळीक साधायला लागतो. निदान माझा तरी तसा अनुभव आहे. देवा तुझ्या प्रेमाचा तो ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
475
Episode 483 as on 20th February 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 20th February 2026प्रेम शुध्द सहज तुझे आतुर तूचि द्यावया। आपुलेपणाने मज लाविसी तू घ्यावया। प्रेमाची आपुलकी मजसी ती कळू दे। देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ तो दत्तजयंतीचा आनंद सोहळा होता. अशा मोठ्या कार्यक्रमात प्रभू काही भक्तमंडळींना बोलायची संधी देत. त्या दिवशी प्रभूंचे परमभक्त भाऊ वैद्य बोलणार होते. पण त्यांना शहापूरहून यायला उशीर होत होता. वेळ भरून काढण्यासाठी मला मनोगत व्यक्त करण्याची अचानक संधी मिळाली. मी आनंदाने भारावून गेलो व बोलता बोलता बोलून गेलो की ' प्रभू तुम्ही कोणत्या नात्याने आमच्यावर एवढे निरलस प्रेम करता ? आम्ही आपले कोण लागतो ? हम आपके हैं कौन ?' प्रभूंनी मला लगोलग सावध केले . " जे ईश्वरत्व माझ्या ठिकाणी आहे त्याच ईश्वराचा अंश तुमच्या ठिकाणी आहे. आम्ही तुमच्याकडे ईश्वरीदृष्टीने पहातो आणि तो ईश्वरी अंश आम्हाला लख्खपणे दिसत असतो. जीवाला ईश्वरी तत्त्वाचा विसर पडला म्हणून गुरूमंत्राचा संस्कार करून बाह्यांगाने आम्ही ते नाते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या ठिकाणी जेव्हा सद्गुरूंवरील प्रेमाची भावना जागृत होईल तेव्हा तुम्हाला या संबंधांचे मूल्य लक्षात येईल . आमच्या चरणाशी आलेले सर्व प्रेमीजन हे माझेच अंश आहेत व म्हणून माझे त्यांचेवरील प्रेम नैसर्गिक आहे . ईश्वराविषयी प्रेमभावना जागृत झाली आणि त्या प्रेमाचे भक्तीत रुपांतर झाले की मग प्रेमीजनांच्याही लक्षात येईल की देवभक्त संबंधात ' हम आपके हैं कौन ' हा विचारच अप्रस्तुत व गैरलागू आहे. " मला फारसे काही कळले नाही पण प्रभूंचे आपल्यावर आत्यंतिक प्रेम आहे . आपल्या ठिकाणी तशी प्रेमभावना उगम पावण्यासाठी प्रभूंच्या संपर्कात सातत्य राखणे आवश्यक आहे हा भाव अधिक दृढ झाला . प्रेमाची आपुलकी मजसी ती कळू दे . देवा तुझ्या प्रेमाचा... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
474
Episode 482 as on 17th February 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th February 2026भक्ताने देवासी या जुळविले प्रेमनाते। देवप्रेम मिळविले जे सर्व नात्यापरते। जीवनात खेळविले प्रेमे परमानंदाते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ रामदास्वामी स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारतात ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' आणि मग स्वतःच ' विचारे मना तूचि शोधूनि पाहे ' असे म्हणत मनाला कामाला लावतात. आता सुख म्हणजे नक्की काय असते ? मनासारखे घडले तर सुख व मनाविरुद्ध घडले की दु:ख अशी सुखदु:खाची सर्वसामान्य व सर्वमान्य व्याख्या केली जाते . कथित सुखप्राप्तीसाठी मानवाने साधने निर्माण केली . या साधनांनी देहसुख प्राप्त झाले पण मन तहानलेलेच राहिले. माझे तसे बरे चालले होते. मी सुस्थितीत होतो पण सुखस्थितीत नव्हतो. मनोविजयाचे वाचन चालू असताना रामदासस्वामींचा हा प्रश्न माझा पाठपुरावा करू लागला आणि म्हणून मी सुखस्थितीचा शोध अवतीभवती सुरू केला . करता करता माझ्या लक्षात आले की कळसा माझ्या काखेतच होता आणि मी उगाचच गावाला वळसा घालत होतो. सुखस्थिती तर प्रभूंच्या चरणाशीच होती. महाराजांनीही ग्रंथात म्हटले होतेच की संत सत्पुरुषच सर्वार्थाने सुखी पुरुष आहेत. त्यांच्या सहवासात सुखस्थितीचा अनुभव येत होताच . जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि योगायोग असा की त्याच सुमारास सुखस्थितीचा अनुभव एरवीही येण्याकरता प्रभूंच्या कृपेने मला सुखी माणसाचा सदराही मिळाला. देवा तुझे नि माझे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
473
Episode 481 as on 13th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th February 2026 कौतुक करूनिया प्रेमे मज सुखविले। प्रेम कैसे द्यावे घ्यावे मज तूचि दाखविले। ते प्रेम तुजसी देता तुज येई प्रेमभरते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ कार्याच्या रूपाने प्रभूंचा खेळ चालूच होता. कधी सामूहिक तर कधी व्यक्तिगत. गुरुवारी निरूपण तर मंगळवारी व्यक्तिगत भेट. या व्यक्तिगत भेटीचे मला नेहमीच अप्रूप असे. प्रभूंशी आमने सामने संवाद होत असे. मला दर मंगळवारी बोलायला मिळावे अशी माझी इच्छा असायची. आणि प्रभू माझे लाड खूप पुरवायचे. पण प्रभूंना सर्वांना सामावून घ्यायचे आहे याचे भानही मला असायचे . कधी कधी कुणाच्या मनातील कधी उत्साहाची तर कधी नैराश्याची भावना जाणून प्रभू त्या व्यक्तीला बोलके करायचे . पण प्रभू कुणाशीही सापेक्षतेने प्रकट होत असले तरी त्यावेळी त्या व्यक्तिगत संदर्भातील तो विशिष्ट प्रसंग बाजूला पडून माझ्या मनातील प्रभू त्या प्रसंगाच्या पलीकडे असलेल्या निरपेक्ष व मूलभूत तत्वांकडेमाझ्या मनाला निर्देश करत आहेत हे मला जाणवायचे . इतरांशी झालेल्या संवादातूनही माझ्या मनाचे पालनपोषण व संगोपन अशा प्रकारे घडत होते. मनाची जोपासना होत होती. मन घडत होते. आम्ही बि घडलो तुम्ही बि घडाना. गुरुवारी निर्गुण असलेले प्रभू मंगळवारी आमच्या भाग्याने सगुण साकार होत असत . म्हणूनच मंगळवारच्या नियमित भेट अमूल्य होती . भक्तिमार्गाकडे वळण्याकरता अप्रत्यक्षपणे प्रेरित करत होती. देवा तुझे नि माझे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
472
Episode 480 as on 10th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th February 2026मी कोण कोठुनिया चरणासी तुझ्या आलो। लडिवाळ भावे माझ्या तुजसी मी प्रिय झालो। उचलोनि प्रेमे मज धरिले तू हृदयाते । देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ प्रभू नेहमी सांगतात की प्रपंचात जो तो आपल्या स्वभावानुसार वागत असतो आणि प्रत्येकाला अहंकार असतो. अहंकारामुळेच संसारात वादविवाद निर्माण होत असतात. मनाच्या श्लोकांमध्ये रामदासस्वामी सांगतात ' तुटे वाद संवाद तो हितकारी ' हे बोलणे सोपे आहे. पण आपण कितीही जुळवून घ्यायचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती वाद घालतेच . मग यातून मार्ग कसा काढावा बरे ? रामदासस्वामी वाद संपवा म्हणून सांगतात पण प्रभू वाद संपवायचा कसा हे मार्गदर्शन करतात. प्रभू सांगतात की आपण दोन पावले माघार घ्यावी कारण , कारण एकच की 'तू माझा आहेस ना ? ' अत्यंत प्रेमाने प्रभूंनी विचारलेला हा प्रश्न मनातील सारी सारी जळमटं साफ करतो. खरचं की मी तर प्रभूंचा आहे ना ? मग क्षुल्लक गोष्टींकरता मी कशाला हट्ट करायचा ? प्रभूंचा हा मंत्र प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगात मला उपयोगी पडला . मी प्रभूंचा आणि प्रभूंचाच आहे हा भाव जेव्हा मनात स्थिर झाला तेव्हा लक्षात आले की काही गंभीर प्रसंग सोडले तर समस्या परिस्थितीत नव्हती तर माझ्या मनःस्थितीत होती. जशी जशी मनःस्थितीत सुधारणा होत गेली , तसे तसे समस्यांचे आपोआप निराकरण होत गेले व मन प्रभूंना अपेक्षित असलेल्या भक्तिमार्गाकडे वळत गेले. ' तू माझा आहेस ना ? ' या शब्दांची ही जादू होती. जादूगार तोचि खरा . देवा तुझे नि माझे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
471
Episode 479 as on 6th February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 6th February 2026भक्ता एक देवगोडी। सारखी त्यांची प्रेमआवडी। परमानंदे देवासारखा गोड होऊनी राहतसे। देवा तुझे प्रेम कसे ॥ प्रभूंनी जवळीक देऊ केली होती. संवाद होत होता. प्रभूंशी बोलताना एक त्यांची एक खूबी आजही जाणवत आहे . कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नाही. पण बाह्यांगाने प्रकट होत असताना त्यांच्या अंतरंगात एक निश्चित असे आध्यात्मिक सूत्र असते . दृष्टांत सर्वसाधारण जीवनविषयक असतात पण निर्देश त्यांच्या ठायी विसावलेल्या त्यांच्या रामाच्या अधिष्ठानाकडे असतो. सुरवातीला हे लक्षात येत नसे पण जसजशी जवळीक वाढत गेली तसतसा त्यांच्या वचनांमधला मूलार्थ उलगडत व उमजत गेला. रामदासस्वामींचे मनाचे श्लोक, मनोविजय ग्रंथामधील श्रीअवधूतस्वामींचे त्या श्लोकांवरील भाष्य व प्रभूंची उल्हसित करणारी वचने या त्रिसूत्रीने माझी जीवनाकडे पहाण्याची दृष्टी बदलत गेली. प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. मी सुध्दा त्या ईश्वराचाच अंश आहे. देहाच्या अभिमानामुळे व अहंकारामुळे माझ्यातील ईश्वराचा अंश झाकोळला गेला आहे. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना.' माझे मीपण सहजासहजी जाण्यासारखे नाही. या साठी प्रभूंशी अधिकाधिक जवळीक साधायला हवी. संसारभाव कमी होत होता पण भक्तिभाव वाढायला हवा हा विचार पक्का होत गेला . जीवन एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचले होते. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना' या अवस्थेतून बाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली होती. परमानंद देवासारखा गोड होऊन राहिला होता. त्या गोडीमध्ये मीपण हळुहळु विरघळण्याची शक्यता होती नव्हे तशी खात्रीच होती . देवा तुझे प्रेम कसे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
470
Episode 478 as on 3rd February 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd February 2026प्रेमसेवन तुझी आवडी। मजसी लागली त्याची गोडी। प्रेमसेवन म्हणूनी माझे सारखे ते घडतसे। देवा तुझे प्रेम कसे॥ लहानपणापासून रोज म्हणता म्हणता रामरक्षा स्तोत्र पाठ झाले होते. दररोज म्हटले जात होते. दत्तप्रभूंच्या कार्यात कृष्णासंगे खेळत आत्मारामाची भेट घ्यायची आहे असे प्रभू वारंवार सांगत असत. रामरक्षेतसुध्दा शेवटी ' भो राम मामुध्दर ' अशी श्रीबुधकौशिक ऋषींनी प्रार्थना केली आहे. हे तोंडपाठ होते. पण प्रापंचिक धावपळीत या प्रार्थनेचा शाब्दिक अर्थ जरी समजला तरी तसा भाव नव्हता. बाह्यांगाने प्रभूंची भेट झाल्यावर त्यांच्या सहवासात व संवादातून हे जीवन लौकिक संसार करण्यासाठी प्राप्त झालेले नसून खऱ्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आहे हा विचार बळावत गेला . दत्तप्रभूंचे कार्य तर त्यासाठीच तर होते . प्रपंचात येत असलेल्या अनुभवातून तर हा विचार अधिक खोलवर रुजत गेला. पण बाह्यांगातला राम बाह्यांगापुरता मर्यादित रहात होता. ' भो राम मामुध्दर ' च्या अनुभवाकरता अंतःकरणात रामाची भेट व्हायला हवी असा भाव निर्माण होत गेला. पण हे सहज शक्य नाही याची जाणीवही झाली होती. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यासाठी प्रयत्नात सातत्य असायला हवे हे लक्षात आले होते. प्रेमसेवनाची गोडी वाढत होती. देवा तुझे प्रेम कसे... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
469
Episode 477 as 30th Jan 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 30th Jan 2026प्रेम गोड तुझे खरोखरी। करिसी सारखे मजवरी। त्या प्रेमाची गोडी म्हणूनी थोडी थोडी कळतसे ॥ एकदा मनाच्या अडचणींवर मात करण्याचे बळ प्राप्त झाल्यावर प्रभूंशी बाह्यांगाने व मनाने संपर्कात व सहवासात सातत्य राखणे सुलभ व सुगम होत गेले. दरम्यान प्रभूंनी 'हा राम माझा' हा ग्रंथ भक्तांना सुपूर्द केला होता . नावावरूनच या ग्रंथाचे आगळवेगळपण स्पष्ट होत होते. हे काही त्रेतायुगातल्या रामाचे चरित्र नव्हते. महाराजांच्या प्रेमसंबंधातून त्यांच्या अंतःकरणात आत्मारामाची भेट झाली होती . 'हा राम माझा' हा ग्रंथ त्या भेटीच्या आत्मानुभवाचा आविष्कार होता . या ग्रंथात रामाच्या अंतःकरणाला प्रमाण मानून नारद लक्ष्मी सुखसंवादातून कथित रामचरित्रातल्या घटनांचे व प्रसंगाचे मार्मिक व मनाला पटणारे व भिडणारे व प्रसंगी प्रचलित समज गैरसमजांना छेद देणारे विवेचन केले आहे. परंतु त्याहीपेक्षा मला भावली ती नारदाची व्यक्तिरेखा. ग्रंथाचे पारायण करत असताना मला प्रभूंच्या विविध रूपांपैकी नारदाच्या रूपाचे आकर्षण वाटायला लागले . प्रभूंना नारदाच्या भूमिकेत पहात असताना मी लक्ष्मीच्या भूमिकेत शिरत होतो व लक्ष्मीच्या भावातून प्रभूंच्या कृपेने नारद व नारायण यांचे प्रेमसंबंध जाणून घ्यायची इच्छा मनात निर्माण झाली होती.देवा तुझे प्रेम कसे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
468
Episode 476 as 27th Jan 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th Jan 2026भक्त हृदी प्रेमप्रवाही। देवाकडे वाहत राही। परमानंद तेथे लवलाही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ कुठल्याही नकारात्मक घटना किंवा कथाप्रसंगातील सकारात्मकता शोधून काढण्याची प्रभूंची हातोटी विलक्षण आहे . त्यांच्या या विशेषत्वाचे मला नेहमीच कुतूहल व आकर्षण वाटायचे , आजही वाटते. त्यांनी स्वतःला कधी कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवले नाही. चाकोरीबाहेरील विचार किंवा कृती करण्याची क्षमता ही त्यांची खासियत होती. ईश्वरी सत्तेत नकारात्मक काही घडूच शकत नाही असे ते आग्रहाने सांगतात. म्हणूनच वृक्षाच्या छायेत विश्रांती घेण्याकरता थांबलेल्या पांथस्थाच्या मनातील प्रत्येक इच्छा जेव्हा पुरी व्हायला लागते तेव्हा परमानंदप्रभूंच्या पांथस्थला परंपरागत दंतकथेप्रमाणे तीभुटातकी वाटत नाही तर ईश्वराची कृपा वाटते . म्हणून इथे भूत नाही तर ईश्वरच प्रकट होईल असा विश्वास त्याला पक्षी परमानंदप्रभूंना असतो. अशी सर्जनशील पार्श्व विचारसरणी मलाही अंगीकारता येईल का ? असा विचार माझ्या मनात यायला लागला. तव प्रेमाच्या मी ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
467
Episode 475 as 23rd Jan 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 23rd Jan 2026तव ठायीच्या मजसी पहावे। मज ठायीच्या तुज दावावे। भावाची त्या पूर्ती होई काही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ प्रभूंचा सहवास वाढत होता. संवाद म्हणावा तर प्रभूच बोलत असत . शुध्द अंतःकरणातून प्रकट होणारी त्यांची वचने मनाला विचार करायला प्रेरित करत होती. सरितेचा प्रवाही दृष्टांत तर ते वारंवार देत असत. सागराच्या ओढीने वहाणे हा सरितेचा गुणधर्म आहे , स्वधर्म आहे . लोकांना तिचा होणारा उपयोग प्रासंगिक व योगायोगाने होत असतो. आपल्याकडून सहजपणे कुठलाही आटापिटा न करता जर कोणाला मदत होत असेल तर करावी पण ते जीवनाचे ध्येय असू शकत नाही. लौकिक नाती जन्म झाल्यानंतर निर्माण झाली आहेत. पण जन्मापूर्वीपासूनच ईश्वराशी आपली नाळ जोडलेली आहे. तो ईश्वरच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. हे मुलभूत सत्य आहे. आणि म्हणून नदीप्रमाणे आपल्या मुळाकडे धाव घेणे हे केवळ कर्तव्य नाही तर तेच क्रमप्राप्त स्वधर्माचरण आहे. मूळाच्या शोधाला नदी निघाली मग भेटीनंतरही आनंदाने वहातच राहिली. मलाही प्रभूंच्या रूपाने माझे मूळ गवसले . त्यांच्या नेत्रातून पाझरणारे प्रेम पुनः पुन्हा भेटीसाठी उद्युक्त करत राहिले . त्यांच्या प्रेमासाठी आसुसलेले मन त्यांच्याकडे वहात राहिले. तव प्रेमाच्या मी ... श्रीपरमानंदार्पणमस्तु
-
466
Episode 474 as on 20th Januanry 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 20th Januanry 2026
-
465
Episode 473 as on 16th January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 16th January 2026
-
464
Episode 472 as on 13th January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th January 2026तू रंगता प्रेम माझे रंगे । प्रेमअनुभव येई सर्व अंगे । रमूनी रंगणे तोचि माझा छंद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥ वासना व अहंकारामुळे जीवाला दु:ख आहे. सुखाच्या मृगजळामागे धावता धावता दु:खच उगाळले जाते. मूर्तितल्या देवाचा धावा करून दु:ख तेवढ्यापुरते दूर होते पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. अनुभवाने हे पटल्यानंतर मी शांति व समाधानाच्या शोधात निघालो व कर्मधर्मसंयोगाने व भाग्याने प्रभूंची भेट झाली व होत राहिली. दु:खापेक्षा दु:खाचे मूळ आहिस्ता आहिस्ता दूर करणारे त्यांचे प्रेम व आपुलकी मनाला स्पर्श करत गेली व प्रेमाची गोडी निर्माण झाली. मनात त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुटला . भेटीत तुष्टता मोठी . ऋणानुबंधाच्या या गाठी . देवा तुझ्या प्रेमाचा ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
463
Episode 471 as on 9th January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 9th January 2026सहवास तुझा अती प्रिय होई। जवळीक तुझी स्मरणात राही। प्रेमी रमणे झाला माझा तो छंद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥ अनावश्यक विचार व कर्मे देहबुध्दीला पोषक आहेत .देहबुद्धी ती आत्मबुध्दी करावी . आता देहबुद्धी आत्मबुध्दी करायची म्हणजे नेमके काय करायचं ? अनावश्यक विचार व कर्म करण्याची प्रवृत्ती जसजशी मनातून हद्दपार होत जाईल तसतशी देहबुध्दी मंद होत जाईल व आत्मबुध्दी जागृत व्हायला सुरुवात होईल . इथे प्रभू एक सोपा मंत्र सांगत. अमुक एक कर्म मीच , करायलाच, पाहिजेच का या तिन्ही प्रश्नांचे होय आले तरच ते कर्म करा. या मंत्रानेच एरवी दुर्गम वाटणारे जीवन सहज होत गेले . देवा तुझ्या प्रेमाचा .. श्रीपरमानंदर्पणमस्तु .
-
462
Episode 470 as on 6th January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 6th January 2026प्रेमात रमणे तुझा अनुभव। प्रेम रंगविणे तुझा तो स्वभाव। म्हणूनी प्रेमे घातली मज साद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥प्रभू रामाच्या भेटीच्या ध्यासातून रामदासस्वामींनी मनाचे श्लोक लिहीले . महाराजांनी मात्र या श्लोकांवर भाष्य करून जीवाला संसारभावातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. परमानंदप्रभूंनी आपल्या वचनांनी हा मार्ग अधिक प्रशस्त केला . मनोविजय ग्रंथाचे नुसते वाचन न करता त्या अनुषंगाने तुमचा भाव प्रकट करा . तुम्ही जसा जसा तुमचा भाव प्रकट करत जाल तशी तशी तुमची सद्गुरुंवरील श्रध्दा व या मार्गावरील बांधिलकी वाढत जाईल. संसारभाव कमी कमी होत जाईल असे सांगितले. श्रीपरमानंदार्पणमस्तु.
-
461
Episode 469 as on 2nd January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 2nd January 2026
-
460
Episode 468 as on 30th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 30th December 2025
-
459
Episode 467 as on 26th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 26th December 2025
-
458
Episode 466 as on 23rd December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 23rd December 2025
-
457
Episode 465 as on 19th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 19th December 2025
-
456
Episode 464 as on 16th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 16th December 2025
-
455
Episode 463 as on 12th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 12th December 2025
-
454
Episode 462 as on 9th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 9th December 2025
-
453
Episode 461 as on 5th December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 5th December 2025
-
452
Episode 460 as on 2nd December 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 2nd December 2025
-
451
Episode 459 as on 28th November 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 28th November 2025
-
450
Episode 458 as on 25th November 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 25th November 2025
-
449
Episode 457 as on 21st November 2025
Guru Shishya Sukhanandsamwad as on 21st November 2025
No matches for "" in this podcast's transcripts.
No topics indexed yet for this podcast.
Loading reviews...
ABOUT THIS SHOW
Parampriya Parmanand Swami Maharaj unraveling the beautiful truth of life via conversation with his disciple. This is the modern-day Bhagvat Gita, Pramanand Prabhuji guiding his disciples just the way Shri Krishna guided Arjun.
HOSTED BY
Saurabh Kapoor
CATEGORIES
Loading similar podcasts...